काल रात्रीपासूनच अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यात मॉन्सून काही दिवसांपूर्वी दाखल झाला. मात्र, म्हणावा तसा पाऊस कोसळताना दिसला नाही. 2 जूनलाच मॉन्सून केरळ दाखल झाला होता. पण तब्बल 15 दिवस अरबी समुद्रातच रेंगाळताना दिसला. राज्यात सर्वदूर पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्र व्यापून आता मॉन्सून गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड भागात पुढे वाटचाल करत आहे. पुढील दोन दिवसात मॉन्सून अरबी समुद्र, मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागात दाखल होईल. राज्यात मॉन्सून दाखल झाला पण अजूनही समाधानकारक पाऊस काही पडत नाहीये. राज्यात पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
अमरावतीमध्ये आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोकणात काही भागात दमदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. पुढील 24 तासात राज्याच्या जवळपास सर्वच भागात धो धो पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा काही राज्यात देण्यात आला. नवी मुंबईत पावसाला सुरवात झाली. एपीएमसी मार्केट परिसरात पाणी भरले. नवी मुबंईतील सखल भागात पाणी भरले.
गेल्या अर्धा तासापासून नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू झाला. नवी मुंबईतील जुईनगर, वाशी, पनवेलमध्ये जोरदार पाऊस आहे. अर्ध्या-पाऊण तासाच्या पावसाने कल्याण डोंबिवलीतील नालासफाईची पोलखोल सदानंद चौक ते अहिल्याबाई चौक परिसर जलमय कल्याण डोंबिवली रात्री 9 .30 च्या सुमारास सुरू झालेल्या पावसामुळे कल्याण पश्चिमेतील सदानंद चौक ते अहिल्याबाई चौक परिसरात पावसामुळे पाणी साचले.
सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. उन्हाळ्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना पावसामुळे दिलासा मिळाला. सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र कडक ऊन पाहायला मिळाले मात्र सायंकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी लावली.