'तुझ्यासारखे हजार पती…,' बोलताच संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली, कोर्टाने मात्र शिक्षा घटवली
Tv9 Marathi June 30, 2026 12:45 AM

पती – पत्नीच्या नात्यात अनेकदा भांड्याला भांडे लागत असते. अनेकदा ही भांडणे दुसऱ्या दिवशी लगेच मिठतातही. मात्र,एका घटनेत पतीच्या रोजच्या मारहाणीला कंठाळलेल्या पत्नीने पतीला तुझ्यासारखे १००० ठेवू शकते असे आव्हान दिले. त्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीचा थेट खून केला. या प्रकरणात मध्य प्रदेशातील हायकोर्टाने एक महत्वाचा निकाल दिला आहे. पत्नीने पतीला असे बोलणे गंभीर असून त्यास अचानक उकसवल्याचे म्हणता येते असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आरोपी पतीची शिक्षा कोर्टाने कमी केली आहे.

हे प्रकरण मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. येथे साल २०२१ मध्ये पती-पत्नी यांच्यात झालेल्या वादात पत्नी किरण हीचा मृत्यू झाला होता. बचाव पक्षाने म्हटले होते की भांडणाच्या वेळी पती शिवा याला त्याच्या पत्नीने म्हटले की तुझ्यासारखे १००० पती ठेवू शकते ! यामुळे संतापलेल्या पतीने जवळ ठेवलेला दगड उचलून तिच्या डोक्यात टाकला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. ट्रायल कोर्टाने या प्रकरणात आरोपी पतीला भारतीय दंड संहितेच्या कलम – ३०४ अंतर्गत दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. नंतर खालच्या कोर्टाच्या निकालाविरोधात आरोपीने हायकोर्टात आव्हान दिले.

हायकोर्टात आरोपीला दिलासा

मध्य प्रदेशातील हायकोर्टाचे न्यायमूर्ती विवेक अग्रवाल आणि न्यायमूर्ती अवनिंद्र कुमार सिंह यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले होते. पत्नीचा हा शेरा पतीच्या आत्मसन्मान आणि त्याच्या अस्तित्वावर अप्रत्यक्ष प्रहार मानला जाऊ शकतो. असे शब्द परिस्थितींनुसार कोणा व्यक्तीच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवू शकतात. पतीने घटनेनंतर स्वत:च पोलिस आणि अन्य लोकांना घटलेल्या घटनेची कल्पना दिली याचाही विचार कोर्टाने निकाल देताना केला. हत्या जर पूर्व नियोजित आणि कट रचून केली असती तर आरोपीचे वर्तन सामान्य मानले गेले नसते. आरोपी स्वत: सोबत कोणतेही हत्यार घेऊन त्याने मारहाण केली नाही. घटनेच्या वेळी मिळालेल्या दगडाने त्याने प्रहार केला.

गंभीर आणि अचानक उकसवणे मानले जाऊ शकते

कोर्टाने आरोपीने कोणत्या परिस्थितीत हे पाऊल उचलले आणि शिक्षेनंतरचे त्याचे वर्तन या सर्वांचा विचार करुन कोर्ट म्हणाले की हत्या अचानक झाली आणि आधीपासून हत्येची कोणतीही योजना नव्हती. यास गंभीर आणि अचानक उकसवणे मानले जाऊ शकते. या सबबीवर कोर्टाने आरोपीच्या शिक्षेला भारतीय दंड संहितेचे कलम ३०४ भाग – I ने बदलून कलम ३०४ – भाग II केले. आणि आरोपींची आजन्म कारावासाची सजा घटवून सात वर्षांच्या कठोर कारावासात परिवर्तित केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.