आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, विकसित भारताचे स्वप्न विकसित शेती आणि समृद्ध गावांशिवाय शक्य नाही. सरकारचे लक्ष केवळ उत्पादन वाढवण्यापुरते मर्यादित नाही, तर खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, पीक विविधतेला चालना देणे आणि शेती फायदेशीर करणे यावरही सरकारचे लक्ष आहे.
लहान जमीनधारक शेतकऱ्यांसाठी पारंपारिक शेती पुरेशी नाही, त्यामुळे मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि कृषी आधारित उद्योजकतेला चालना देणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, 'प्रगती' हा याच विचारसरणीचा विस्तार आहे जो शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि बाजारपेठांशी जोडून त्यांचे खरे उत्पन्न वाढवण्याचा मार्ग मोकळा करेल.
हा उपक्रम देशातील प्रमुख कृषी राज्यांमध्ये – मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम आणि झारखंडमध्ये राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत निर्माण करण्यात येणारे कृषी-उद्योजक सल्ला, माती परीक्षण, यंत्र सेवा, आर्थिक दुवे, बाजार जोडणी आणि गावपातळीवर उत्पन्नाच्या पर्यायी संधी उपलब्ध करून देतील.
या कार्यक्रमात महिलांच्या सहभागाला विशेष महत्त्व देत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह म्हणाले की, मोठ्या संख्येने 'कृषी सखी' आणि महिला उद्योजक या बदलाचे मुख्य केंद्र बनतील आणि प्रत्येक उद्योजक संपूर्ण गावाचे चित्र बदलू शकेल.