मागच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. उष्णता वाढत आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. यादरम्यानच सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भागात हलका पाऊस होईल. सध्या अरबी मसुद्रात अफगाणिस्तानच्या दिशेने वारे वाहत आहे. ज्यामुळे मॉन्सूनचा प्रभाव कमी झाला. 20 जुलैला पुन्हा मॉन्सून जोरदार हजेरी लावण्याचा अंदाज आहे. काही भागात रात्री जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणही बघायला मिळतंय. हिस्सार, गोरखपूर, माणिपूरपर्यंत मॉन्सून सक्रिय आहे. बांगलादेश येथे समुद्रसपाटीपासून 4.5 ते 58 किलोमीटर उंचीवर वारे वाहत आहे.
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना या परिसरात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. 20 जुलैदरम्यान राज्यात पुन्हा एकदा धो धो पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आहे. -नंदुरबार जिल्ह्यात पुढील 10 दिवसांत पाऊस न झाल्यास शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
विरचक धरणात 47 टक्के पाणीसाठा, मात्र गाळामुळे वापरयोग्य पाणी कमी. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य; गरज पडल्यास शेतीसाठीचे पाणी बंद करण्याचे संकेत. सध्या शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा; परिस्थिती गंभीर झाल्यास कठोर निर्णय प्रशासनाकडून घेतले जाऊ शकतात. बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने धारूर परिसरातील पिकांनी टाकल्या माना, धान सुकायला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.
जुलै महिना अर्धा संपला तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणी केली मात्र आता पावसाने दांडी मारल्याणे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. अनेक भागातील पिके सुकायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांवर तिहेरी संकट ओढावण्याची शक्यता. त्यामध्येच 20 जुलैनंतर राज्यात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.