पाकिस्तान संघात बाबर आझमची काहीच इज्जत नाही! कर्णधाराला न विचारताच घेतला निर्णय
GH News September 08, 2026 11:12 PM

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाची नाचक्की झाली आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका दुसऱ्या सामन्यानंतर गमावली आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना औपचारिक असणार आहे. एजबेस्टन क्रिकेट ग्राउंडमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 9 सप्टेंबरपासून सामना होणार आहे. त्यामुळे लाज राखण्यासाठी पाकिस्तान संघ मैदानात उतरणार आहे. असं असलं तरी पाकिस्तान संघाशी निगडीत बातम्या काही संपण्याचं नाव घेत नाही. आता कर्णधार बाबर आझमने एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. बर्मिंघमममध्ये कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यापूर्वी बाबर आझमने एक खुलासा केला आहे. यामुळे पाकिस्तान संघ आणि बोर्डाच्या नजरेत बाबर आझमची काहीच इज्जत नसल्याचं दिसून येत आहे. बाबर आझमने खुलासा केला की, लॉर्ड्स कसोटी सामन्यातील पराभवानंतर टीम बदलाच्या निर्णयाबाबत कोणतीही माहिती नव्हती.

तिसऱ्या कसोटी सामन्यात काही नव्या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार हे नक्की आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लॉर्ड्स कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर मोठा निर्णय घेतला होता. मोहम्मद रिझवान, इमाम उल हक, सलमान आगासहीत सात खेळाडूंना स्क्वॉडमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या जागी सात नव्या खेळाडूंना इंग्लंडला पाठवलं आहे. कर्णधार बाबर आझमला याबाबत विचारलं तेव्हा त्याने स्पष्ट केलं की, यााबाबतची बातमी नंतर मिळाली. बाबर आझम पत्रकार परिषदेत म्हणाला की, ‘माझ्यासाठीही एक बातमी होती. मला याबाबत नंतरच कळलं. पीसीबीने हा निर्णय घेतला. त्यामुळे तेच याबाबत सविस्तर काय ते सांगू शकतात.’

बाबर आझमची काही इज्जत नाही…

बाबर आझमच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा पाकिस्तानी संघात कर्णधार आणि प्रशिक्षकाची काहीच इज्जत नसल्याचं स्पष्ट होत आहे. कारण संघाचे सर्व निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी खेळाडूंच्या निवडीत हस्तक्षेप करत आहेत किंवा निवड समिती थेट असे निर्णय घेत आहे. त्यामुळे कर्णधाराशी कोणतीच चर्चा होत नसल्याचं अधोरेखित होत आहे. आता बाबर आझमला बदलेल्या संघासह मैदानात उतरावं लागणार आहे. इतकंच काय तर कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.