भारतीय संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेदरम्यान स्टार खेळाडू संघाबाहेर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह
गणेश लटके September 15, 2026 02:13 AM

India Afghanistan T20 series :  भारतीय क्रिकेट संघाबद्दल एक महत्चावी अपडेट समोर आली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. यामुळं आशियाई क्रीडा स्पर्धेतील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून तो नुकताच सावरला होता. त्यानंतर आता पुन्हा तो दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याला नेमकी कोणत्या प्रकारची दुखापत झाली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पहिल्या सामन्यात वरुणने केली होती उत्कृष्ट गोलंदाजी 

मिळालेल्या माहितीनुसार, वरुणच्या दुखापतीची आणि मालिकेतून त्याच्या बाहेर पडण्याची माहिती मिळत आहे. बीसीसीआयने वरुणच्या दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की ही एक दुसरी दुखापत आहे, ज्यामुळे त्याला मालिकेतून वगळण्यात आले आहे. अफगाणिस्तान टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात वरुणने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत केवळ 16 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. त्याला भारतीय संघात सातत्याने संधी दिली जात आहे, परंतु त्याची दुखापत वरुणसाठी एक मोठी समस्या बनत आहे.

खेळाडूंना वारंवार होणाऱ्या दुखापती

अलीकडे, खेळाडूंना वारंवार होणाऱ्या दुखापतींचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यामुळे भारतीय संघाला अडचणी येत आहेत. संघात वरुणची जागा कोणता खेळाडू घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

वरुण चक्रवर्तीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

भारतासाठी व्हाईट-बॉल क्रिकेट खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत चार एकदिवसीय आणि 49 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. चार एकदिवसीय डावांमध्ये त्याने 10 बळी घेतले असून, त्याची सर्वोत्तम कामगिरी 5/42 आहे. उर्वरित 46 टी-20आंतरराष्ट्रीय डावांमध्ये त्याने 75 बळी घेतले असून, त्याची सर्वोत्तम कामगिरी 5/17 आहे.

वरुण चक्रवर्ती हा सध्या भारतीय टी-20 संघातील महत्त्वाचा फिरकी गोलंदाज

वरुण चक्रवर्ती हा सध्या भारतीय टी-20 संघातील महत्त्वाचा फिरकी गोलंदाज मानला जातो. आपल्या अचूक गोलंदाजीसह मधल्या ओव्हर्समध्ये विकेट मिळवून देण्याची त्याची क्षमता ही भारतीय संघासाठी मोठी ताकद आहे. त्यामुळे त्याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. वरुणच्या दुखापतीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात तो खेळू शकणार की नाही हे पहावे लागणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.