शिल्पा शेट्टी ते श्वेता तिवारीपर्यंत... चाळीशीनंतरही विशीतल्या तरुणीप्रमाणे दिसायचे असेल तर 'या' गोष्टी करणे टाळा
Times Now Marathi September 20, 2024 09:45 PM

Avoid Unhealthy Habits after 40s: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ते श्वेता तिवारी (Shweta Tiwari) aपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या वयाच्या चाळीशीतही अगदी 20 वर्षाच्या तरुणीप्रमाणे सुंदर आणि आकर्षक दिसतात. त्यांच्यातली स्फूर्ति आणि ऊर्जा तरुण मुलींना लाजवेल अशी आहे. तुम्हाला देखील त्यांच्यासारखेच चिरतरुण दिसायचे असेल तर दैनंदिन जीवनातील या गोष्टी करणे टाळा. (bad habits to avoid by your 40s) कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या.

चाळीशीनंतर सामान्यतः महिलांमध्ये कंबर दुखी, संधिवात सारख्या समस्या निर्माण होतात. इतकेच नव्हे तर अनेक आरोग्य समस्या देखील याच काळात उद्भवतात. पण काही गोष्टी टाळण्यास या समस्यांपासून दूर राहता येऊ शकते.


40 नंतर या वाईट सवयी टाळावयाच्या 40 नंतरही निरोगी आणि मजबूत राहायचे असेल, काही सवयीमध्ये आताच बदल करून घेणे गरजेचे आहे. जसे की-

व्यायाम न करण्याची सवय
आजकाल अनेक महिला निष्क्रिय जीवनशैली जगत आहेत. खास करून ज्या महिला घरात आहेत, त्यांच्यात व्यायामाचा अभाव असल्यामुळे त्यांना अनेक आजार जडतात. त्यामुळे व्यायाम आणि सक्रिय राहणे शरीर आणि हृदयासाठी चांगले आहे. सक्रिय नसल्यामुळे शरीर कमकुवत होते, लवचिकता कमी होते आणि इतर आजारांचा धोका वाढतो.


पुरेशी झोप न घेणे
दिवसरात्र काम तसेच अनिद्रामुळे अनेक महिला पुरेशी झोप घेऊ शकत नाही. ने नित्याचे झाल्याने शरीराला आजार जाणवतो. शरीरात आळस येतो. काहीही करावेसे वाटत नाही. मेंदू काम करत नाही. त्यामुळे पुरेशी झोप घेण्यास प्राधान्य द्या.


जंक फूडचे अतिसेवन
जंक फूडचे सेवन शरीर आजारी पाडते. वयानुसार निरोगी राहण्यासाठी आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. जिभेला गोष्टी आवडतात म्हणून ते खाणे आणि आजार मागून घेणे चुकीचे आहे.


मानसिक तणावाखाली राहणे
नकारात्मक लोकांमध्ये राहणे, स्वतःकडे दुर्लक्ष करणे, स्वतःची इतरांसोबत तुलना करणे, या सर्व गोष्टींमुळे कधी कधी नकळत मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. जो शरीर कमजोर बनवण्यास आणि वयापेक्षा अधिक वृद्ध दिसण्यास कारणीभूत ठरतो.


धूम्रपानाची सवय
वाढत्या वयात तंबाखूच्या अतिसेवनाने अनेक आजार होऊ शकतात. म्हणून, शक्य तितक्या लवकर ही सवय मोडून टाका.


आरोग्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष
40 नंतर नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. आरोग्याशी संबंधित समस्या वेळेवर शोधण्यात आणि वेळेवर उपचार करण्यास त्यामुळे मदत होते.


पाणी न पिणे
दररोज 7 ते 8 ग्लास पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे शरीराचे निर्जलीकरण होत नाही. मुबलक पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. स्नायूंची लवचिकता सुधारते आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. जेणेकरून त्वचा देखील ताजी राहण्यास मदत मिळते.


सामाजिक संपर्क टाळणे
अनेक महिला घरात एकटे राहणे पसंत करतात. त्यांना जास्त मित्र मैत्रिणी नसतात. फक्त काम एके काम इतकेच असते. मात्र, मानसिक आरोग्यासाठी मित्रमैत्रिणींना भेटत राहणे, बोलत राहणे, बाहेर फिरत राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एकटेपणा, दुःख या भावना जाणवत नाहीत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.