Bigg Boss Marathi Season 5 Captaincy Task : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) घरात सतत कोणा ना कोणामध्ये वाद होत असतात. घरात आता खेळाला रंग चढू लागला आहे. आठव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या कॅप्टनसी कार्यात कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार हे पाहताना प्रेक्षकांना मात्र येईल.
दरम्यान या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये निक्की-अरबाज, पॅडी आणि वर्षाताई यांच्यामध्ये शाब्दिक खटके उडत असल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या टास्कमध्ये कॅप्टन्सीची कुणाची तहान भागणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसेच या आठवड्यात घरातला कॅप्टन कोण होणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात कॅप्टनसी पदासाठी भागवावी लागणार सर्व प्राण्यांची तहान. दरम्यान प्रोमोमध्ये वर्षा ताई म्हणत आहेत,"आपली तहान भागवा". अरबाज म्हणतोय,"हे खूप गोड पाणी आहे". अरबाजला निक्की विचारतेय,"कालपासून तू इतका गोड होतास...अचानक तुझं पाणी गोड कसं झालं?".
पॅडी दादा वर्षा ताईंना विचारत आहेत,"आम्ही पाणी पिऊ यावर तुमचा विश्वास होता का?". त्यावर वर्षा ताई "हो असं वाटलं होतं", असं उत्तर देतात. पुढे पॅडी दादा वर्षा ताईंना स्पष्टच म्हणतात,"स्टॅटर्जी करताना तुम्ही त्यांच्यासोबत बसणार आणि आमच्यावर विश्वास ठेवणार".
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय की, बिग बॉस मराठी सीझन 5ची फायनल 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावर अनेकांनी कमेंट्स त्यांना फायनलमध्ये कोणाला पाहायला आवडेल त्यांची नावं कमेंट्समध्ये टाकली आहेत.
View this post on Instagram