चिखली, ता. २ : माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्यावतीने चिखली येथे माहिती अधिकार दिन नुकताच साजरा करण्यात आला. माहिती अधिकार कायदा २००५ हा जनतेच्या भल्यासाठी असून त्याचा योग्य आणि प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते आणि तज्ञांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते नीलेश केवट रामचंद्र साबळे, रघुनाथ माळी, धनाजी पाटील, संदीप पाटील, संतोष टकले, गणेश हुलसुरे आदी पिंपरी-चिंचवड तसेच पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहिती अधिकार कायदा हा आपल्या हक्काचा कायदा असून अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि जनतेपर्यंत माहितीची देवाण-घेवाण करण्याची त्याचबरोबर भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी ते एक मोठे साधन आहे.