Thackeray group slams Modi for always lying msj
Marathi October 04, 2024 05:24 PM


मोदी तसेच त्यांचे लोक आंदोलन आणि सत्याग्रह चिरडून टाकतात. शेतकऱ्यांच्या आंदोलनात 670 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. काळ्या कृषी कायद्यांविरुद्ध हे आंदोलन दोन वर्षे चालले. हे काळे कायदे उद्योगपती अदानी यांच्या फायद्यासाठी आणले होते. त्या कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चोर, अतिरेकी ठरवले गेले, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

(SS UBT Vs BJP) मुंबई : महात्मा गांधी यांचा सत्यावर संपूर्ण विश्वास होता. सत्यावरील त्यांच्या अढळ निष्ठेमुळे त्यांनी दुष्टपणा तसेच अहंकार अशा विकारांवर मात केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सदैव खोटे बोलतात आणि खोटे वागतात. त्यांचा सत्यावर काडीमात्र विश्वास नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group slams Modi for always lying)

गांधी म्हणत, ‘‘या जगताचा आधार नीती आहे. सत्यामध्ये नीतीचा समावेश आहे.’’ ते संध्याकाळच्या प्रार्थना सभेत नेहमीच सत्याची कास धरा असे सांगत. सत्यावर विश्वास ठेवा, सत्याचाच मार्ग धरा, सत्य बोलत रहा, असा आग्रह धरत. मोदी यांना सत्याची ही गांधी भूमिका पचणारी नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

– Advertisement –

हेही वाचा – SS UBT Vs BJP : हा मोदींनी केलेला विनोद, ठाकरे गटाची खोचक टिप्पणी

गांधी हे दुतोंडी नव्हते. ते निर्भय होते. कारण ते फक्त सत्य बोलत. गांधीजी म्हणजे सत्य. ते इतके सत्यमय झाले होते की, त्यांनी जगभरातील दुर्बलांच्या हातात अन्यायाविरुद्ध लढण्याचे जे शस्त्र दिले, त्याचेच नाव ‘सत्याग्रह’ आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात नमूद केले आहे.

– Advertisement –

मोदी तसेच त्यांचे लोक आंदोलन आणि सत्याग्रह चिरडून टाकतात. शेतकऱ्यांच्या आंदोलनात 670 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. काळ्या कृषी कायद्यांविरुद्ध हे आंदोलन दोन वर्षे चालले. हे काळे कायदे उद्योगपती अदानी यांच्या फायद्यासाठी आणले होते. त्या कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चोर, अतिरेकी ठरवले गेले. त्यांना देशद्रोही म्हणून संबोधण्यात आले. शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य संग्रामात रक्त सांडले नसते तर मोदी हे देशाचे पंतप्रधान कधीच झाले नसते, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

गांधी राजकारणाचा तसेच विचाराचा पाया सत्य हाच होता. गेल्या दहा वर्षांत हा पायाच ढासळला आहे. मोदी यांनी देशातील सत्य मारून असत्याचे राज्य आणले. त्यांनी सर्व भ्रष्ट तसेच खोटारड्या लोकांना एकत्र केले आणि तीच त्यांची ताकद. न्यायालयांतूनही सत्य संपवले. घटना, संविधानिक संस्थांतूनही सत्याचा विनाश केला. महाराष्ट्रासारख्या राज्यात मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असत्याचे राज्य चालवले आहे. त्यामुळे कोणत्या गांधी विचारांची त्यांना चिंता लागून राहिली आहे? तुमच्या राजवटीत गांधी विचार रोज मारला जात आहे, हेच सत्य असल्याची टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – NCP SP Vs Mahayuti : दावोसची बिले प्रलंबित ठेवल्याची सरकारला नोटीस, रोहित पवारांचा दावा


Edited by Manoj S. Joshi



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.