Ahilyanagar : अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'; महाराष्ट्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारची मंजुरी
esakal October 05, 2024 12:45 AM

अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून होत आहे. यादरम्यान अखेर केंद्र सरकारने राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

"अहील्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!! नगर जिल्ह्याचे नामांतर अहील्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे.

निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मनापासून आभार!" अशी पोस्ट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.