टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला टी 20I सामना हा ग्वाल्हेर येथील न्यू माधवराव शिंदे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं तर नजमुल शांतो बांगलादेशचं नेतृत्व करत आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. भारताने टॉस जिंकला. कॅप्टन सूर्यकुमारने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाकडून दोघांचं पदार्पण झालं आहे. टीम मॅनेजमेंटने मयंक यादव आणि नितीश रेड्डी या दोघांवर विश्वास दाखवत त्यांना पदार्पणाची संधी दिली आहे.
भारताने टॉस जिंकला
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), परवेझ हुसैन इमॉन, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, झाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि शोरीफुल इस्लाम.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.