Ratan Tata Death: रतन टाटा यांना होती कमी रक्तदाबाची समस्या, जाणून घ्या या आजाराचा कोणत्या अवयवांना सर्वाधिक धोका
Idiva October 11, 2024 06:45 AM

रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील एका रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 86 वर्षे होते. वयोमानाशी संबंधित वैद्यकीय समस्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.वैद्यकीय अहवालानुसार त्यांना कमी रक्तदाब म्हणजे लो बीपीचा त्रास होता. रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना हाइपरटेंशन तक्रार होती.

istockphoto

तुम्हाला कधी काही आजार झाला तर तुम्ही सर्वात आधी डॉक्टरांना भेटायला जाता. डॉक्टरांना भेटायला गेल्यानंतर डॉक्टर सर्वप्रथम तुमचा रक्तदाब म्हणजे बीपी तपासतात. डॉक्टर सर्वप्रथम बीपी का तपासतात,डॉक्टराना सर्वप्रथम बीपी का तपासावा लागतो, त्यामाघेही कारणं आहे.अर्ध्याहून अधिक रोग बीपी द्वारे शोधले जाऊ शकतात. सद्या भारतात हाय बीपी, हायपरटेन्शन किंवा लो ब्लडप्रेशरची समस्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. डब्ल्यूएचओचा अंदाज आहे की भारतातील प्रत्येक चौथ्या व्यक्तीला उच्च आणि निम्न रक्तदाब म्हणजे हाय तुला लो बीपीची समस्या आहे.गेल्या वर्षी जूनमध्ये, ICMR-इंडियाच्या मधुमेहाच्या अभ्यासात असे दिसून आले की देशातील 3 कोटींहून अधिक लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत.तर बर्याच लोकांना असे वाटते की उच्च बीपी फक्त हृदयासाठी धोकादायक आहे. परंतु तसे नाही बीपी हाय असो किंवा लो यामुळे अनेक अवयवांना धोका असतो. चला जाणून घेऊया उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबामुळे कोणत्या अवयवांना सर्वाधिक धोका असतो.

1. मेंदू

रक्तदाब वाढल्यामुळे मेंदूच्या पेशींना इजा होण्याचा धोका असतो. रक्तदाब जास्त वाढल्यामुळे मेंदूच्या पेशी फुटू शकतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

2. डोळे

मधुमेही रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे डोळ्यांच्या नसांना इजा होण्याचा धोकाही वाढतो. मधुमेहाच्या रुग्णांना आधीच अनेक समस्या असल्याने रोगप्रतिकारक शक्ती किंवा पुनर्प्राप्ती प्रणाली कमकुवत होते. उच्च रक्तदाबामुळे मधुमेही रुग्णांच्या डोळ्यातील नसाही फुटतात किंवा अनेकदा नीट काम करणे बंद होते.

3. किडनी निकामी होऊ शकते

रक्तदाबामुळे मूत्रपिंडाचे आजार किंवा किडनी निकामी होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांना पक्षाघाताचा धोकाही जास्त असतो.

4. हृदय

बीपी कमी झाला की त्याचा हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो. हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही. असा परिस्थिती तुम्हाला हृदयविकाराचा झटका देखील होऊ शकतो.

istockphoto

वाढत्या वयानुसार रक्तदाब का कमी होतो?

जर रक्तदाब 90/60 मिमी एचजीच्या खाली आला तर त्याला कमी बीपीची समस्या म्हणतात. रक्तदाब कमी झाला की त्याचा थेट परिणाम हृदयाच्या कार्यावर होतो. हृदय योग्यरित्या रक्त पंप करणे बंद करते. त्यामुळे शरीराच्या अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. यामुळे एकाच वेळी शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, परंतु हे सर्व तेव्हाच होणे शक्य आहे,जेव्हा बीपी दीर्घकाळ कमी राहून त्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही.कमी रक्तदाबाची अनेक वेगवेळी कारणे आहेत. शरीरात पाण्याची कमतरता, थायरॉईड,आणि कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावामुळे देखील कमी रक्तदाब होऊ शकतो. काही लोकांमध्ये, बीपी कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक दिसतो. अशा वेळेस त्या व्यक्तीला मानसिक आजार असण्याची शक्यता जास्त आहे.या स्थितीत व्यक्तीला चक्कर येऊ लागतात आणि ती बेशुद्ध पडू शकते.

तणाव आणि अनियंत्रित खाणे ही उच्च आणि कमी रक्तदाबाची मुख्य कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. याशिवाय लठ्ठपणा, झोप न येणे, तेलकट टुपकट पदार्थांचे सेवन करणे आणि मिठ अति प्रमानात खने ही आणखी काही कारणे असू शकतात ज्यामुळे तुम्हाला बीपी होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हाय बीपी आणि लो बीपी तुम्ही हायपर टेन्शनच शिकार होऊ शकतात.


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.