'सिंहगड' पाहिला, पण ही शौर्यगाथा माहिती आहे का? इतिहास जिवंत होईल!
esakal March 03, 2025 03:45 AM
Tanaji Malusare Sinhagad Battle सिंहगड

सिंहगड जिंकणे सोपे नव्हते, कारण तिथे पराक्रमी राजपूत योद्धा उदयभान राठोड आपल्या शेकडो सैनिकांसह सज्ज होता.

Tanaji Malusare Sinhagad Battle युद्धकौशल्य

शिवरायांना ठाऊक होते की किल्ला दुर्ग काबीज करण्यासाठी पराक्रम, धैर्य आणि युद्धकौशल्य असलेला योद्धा हवा, आणि तानाजी मालुसरे यांच्यासारखा वीर दुसरा कोण असू शकत होता?

Tanaji Malusare Sinhagad Battle लढाई

तानाजींना डोंगरदऱ्या, कड्याकपाऱ्या आणि गडाचे गुंतागुंतीचे मार्ग यांची संपूर्ण माहिती होती, त्यामुळे त्यांनी लढाईसाठी तयारी सुरू केली.

Tanaji Malusare Sinhagad Battle अनुभव

कोळी, हेटकरी, मेटकरी, नागवंशी, रामोशी आणि बेरड यांच्याशी त्यांनी असलेला परिचय आणि त्यांच्या युद्धकौशल्याचा अनुभव गड जिंकताना फार उपयुक्त ठरला.

Tanaji Malusare Sinhagad Battle शत्रू

४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजी, सूर्याजी आणि शेकडो मावळे सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचले, शत्रूच्या कानावरही ही बातमी जाऊ दिली नाही.

Tanaji Malusare Sinhagad Battle धाडसी निर्णय

गडावर प्रवेश करण्यासाठी पुणे आणि कल्याण असे दोन मोठे दरवाजे होते, पण तानाजींनी धाडसी निर्णय घेत गुप्त आणि कठीण मार्ग निवडला.

Tanaji Malusare Sinhagad Battle दोणगिरीचा कडा

दोणगिरीचा कडा तासलेला आणि खोल होता, त्यामुळे तिथे पहारा नव्हता, हे तानाजींनी अचूक हेरले.

Tanaji Malusare Sinhagad Battle गड

गड चढण्याचा हा मार्ग अत्यंत कठीण होता, पण तानाजींनी आपल्या मावळ्यांना धीटपणे आज्ञा दिली

Tanaji Malusare Sinhagad Battle मावळा

दोन मावळ्यांनी मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी ठेवत कड्यावर चढून दोर सोडला आणि एक-एक मावळा गडावर पोहोचू लागला.

Tanaji Malusare Sinhagad Battle उदयभान

इतक्या शिस्तबद्धपणे मावळे गडावर पोहोचले की शत्रूला याचा सुगावाही लागला नाही, पण एकदा ही खबर उदयभानाच्या कानावर गेली, तेव्हा तो संतापाने पेटून उठला.

Tanaji Malusare Sinhagad Battle घनघोर युद्ध

रात्रीच्या अंधारात तानाजी आणि उदयभान यांच्यात घनघोर युद्ध पेटले, तलवारींच्या ठिणग्या हवेत उडू लागल्या.

Tanaji Malusare Sinhagad Battle ढाल

तानाजींनी जोरदार हल्ला केला, पण अचानक त्यांच्या हातातील ढाल तुटली, तरीही ते मागे हटले नाहीत.

Tanaji Malusare Sinhagad Battle शत्रूचे वार

त्यांनी शत्रूचे वार झेलण्यासाठी हाताला शेला गुंडाळला आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले.

Tanaji Malusare Sinhagad Battle बलिदान

शेवटी तानाजी धारातीर्थी पडले, पण त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता सूर्याजी आणि शेलारमामा यांनी युद्धाची धुरा हाती घेतली.

Tanaji Malusare Sinhagad Battle पराक्रम

प्रचंड संघर्षानंतर उदयभानाचा पराभव झाला, सिंहगड जिंकला गेला आणि स्वराज्याच्या इतिहासात एका महान पराक्रमाची भर पडली!

Tanaji Malusare Sinhagad Battle २६ गड स्वराज्यात

या विजयानंतर चार महिन्यांत २६ गड स्वराज्यात सामील झाले आणि शिवरायांचे स्वप्न साकार झाले.

What was the diet of Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश होता?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.