Champions Trophy: भारत - न्यूझीलंड फायनलसाठी राखीव दिवस असणार का?
esakal March 09, 2025 08:45 AM
India vs New Zealand अंतिम सामना

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.

India vs New Zealand भारत विरुद्ध न्यूझीलंड

अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन तगडे संघ आमने-सामने असणार आहेत.

India vs New Zealand दुबई

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना होईल.

Rain पावसामुळे रद्द

या चॅम्पियन्स ट्रॉफीतील आत्तापर्यंत ३ सामने पावसामुळे रद्द झाले आहे. पण हे सामने पाकिस्तानमध्ये होणार होते.

Team India ९ मार्चला सामना झाला नाही तर?

दुबईत अंतिम सामन्यावेळी पावसाची चिन्ह नाहीत. मात्र तरीही जर पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर ९ मार्चला हा अंतिम सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर काय होणार?

New Zealand Team राखीव दिवस असणार?

अंपायर्स ९ मार्च रोजीच हा सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. पण जर सामना पूर्ण होऊच शकला नाही, तर १० मार्च हा राखीव दिवस सामन्यासाठी असणार आहे.

Team India राखीव दिवस

त्यामुळे जर ९ मार्चला सामना पूर्ण झाला नाही, तर तो १० मार्चला राखीव दिवशी पूर्ण केला जाईल.

New Zealand Team ... सामना पूर्णच झाला नाही तर?

दरम्यान, जर राखीव दिवशीही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर मात्र दोन्ही संघांना संयुक्त रित्या विजेतेपद दिले जाईल.

Ellyse Perry RCB च्या परदेशी खेळाडूंचा 'देसी गर्ल' लूक; एलिस पेरीनं वेधलं लक्ष
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.