गुढीपाडवा हा सण तेजश्री प्रधानसाठी खास आहे. तिच्या लहानपणीच्या गोड आठवणी ती शेअर करत आहे.
'गुढीपाडवा आला की घरच्या अंगणात गुढी उभारण्याचा एक वेगळाच उत्साह असायचा,' अशी प्रतिक्रिया तेजश्री प्रधानने दिलीय.
'गुढीवर बत्ताशांची माळ लावली जायची. मला ते बत्ताशे खूप आवडायचे, त्यामुळे गुढीला ती माळ घालणे म्हणजे माझ्यासाठी खास क्षण आहे.' असं तेजश्रीने म्हटलंय.
'मी नेहमी गुढी उभारल्यानंतर ती तसेच ठेवायचे, कारण मला बत्ताशांची माळ तशीच राहावी असं वाटायचं.'
'संध्याकाळ झाली की, हळूहळू गुढीवरील बत्ताशे खाण्याचा माझा ठरलेला कार्यक्रम सुरू व्हायचा!'
'गुढीपाडवा हा संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाने साजरा करायचो. गोडधोड पदार्थ, नवे कपडे आणि आनंदी वातावरण!'
'आजही गुढीपाडवा आला की तेच लहानपणीचे क्षण आठवतात आणि पुन्हा एकदा मन आनंदित होतं.'
'हा सण नव्या सुरुवातीचा, सकारात्मकतेचा आणि आनंदाचा असतो, असं तेजश्री सांगते.'