आपण झाशीची राणी, मंगल पांडे यांच्याबद्दल ऐकलंय…पण कोल्हापुरातही १८५७ साली स्वातंत्र्याची ठिणगी पेटली होती.
कोल्हापूरचे शाहू उर्फ चिमासाहेब महाराज स्वाभिमानी, तेजस्वी आणि तडफदार मराठा! उठावामागील खरे प्रेरणास्थान!
३१ जुलै १८५८ रोजी कोल्हापुरात २७व्या पलटणीतील २०० शिपायांनी उठाव सुरू केला. इंग्रज अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर हल्ला केला
शिपायांनी इंग्रजांचा खजिना लुटला, ५० हजार रुपये ताब्यात घेतले. यात ३ इंग्रज अधिकाऱ्यांचा खात्मा झाला.
या उठावाचे नेतृत्व करत होते रामजी शिरसाट. त्यांच्या नेतृत्वात इंग्रज फौजेला धक्का दिला
बेळगावहून आलेल्या लेफ्टनंट केरच्या फौजेनं शिपायांवर हल्ला केला. राधाकृष्ण मंदिरात लपलेल्या ४० शिपायांचा मृत्यू झाला.
१८ ऑगस्ट रोजी ८ जणांना तोफेच्या तोंडी, २ जणांना फाशी, तर ११ जणांना गोळ्या घातल्या. परत ६ डिसेंबरला पुन्हा उठाव झाला
कर्नल जेकब यांना चिमासाहेबांवर संशय आला. तो म्हणाला, “हाच तो तेजस्वी मराठा!” (जेकबची नोंद).
रात्रीच्या वेळी चिमासाहेबांना अटक. मुंबईमार्गे कराचीला नेण्यात आले. तेथेच कैदी म्हणून शेवटचा श्वास घेतला.
१५ मे १८६९ रोजी चिमासाहेबांचा मृत्यू. आजही कराचीतील लिहारी नदीकाठी त्यांची समाधी स्मरण करते कोल्हापूरच्या क्रांतीचा इतिहास आहे.