हिंदू धर्मात स्वयंपाकघराला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. वास्तुशास्त्रातही आहारबद्दल आणि स्वयंपाकघराबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास घरात सुख-समृद्दी, यश, प्रगती, आनंद नांदतो असे सांगितले जाते. यात घरात पोळ्या बनवण्यासंदर्भात काही नियम सांगण्यात आले आहेत. अनेक महिलांना घरातील सदस्यांना विचारून पोळ्या बनवण्याची सवय असते. पण, शास्त्रानुसार हे अयोग्य मानले जाते. जर महिलांनी मोजून पोळ्या बनवल्या तर त्याचे दुष्परिणाम घरातील व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर आणि प्रगतीवर दिसण्यास सुरूवात होते. तसेच पोळ्या बनवण्यासाठी योग्य दिशाही शास्त्रात सांगण्यात आली आहे. आज आपण जाणून घेऊयात पोळ्या बनवताना कोणते वास्तुनियम लक्षात घेणे आवश्यक आहे, जेणेकरून घराच्या प्रगतीत अडथळे येणार नाहीत.
वास्तुनियम खालीलप्रमाणे –
- अनेक महिलांना पोळ्या बनवण्यापूर्वी घरातील सदस्यांना किती खाणार अशी विचारण्याची सवय असते. पण, वास्तुशास्त्रामते हे पूर्णत: चुकीचे आहे.
- पोळी सूर्याशी निगडीत आहे. त्यामुळे ती मोजून केल्यास सूर्यदेवाचा अपमान होते असे सांगितले जाते.
- पोळ्या बनवताना गॅस शेगडी स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात असावी असे सांगण्यात आले आहे.
- पोळी बनवताना गृहिणीचे तोंड पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते.
- स्वयंपाकघरात बनवली जाणारी पहिली पोळी गायीला देणे शुभ असते. गायीला शक्य नसल्यास कुत्र्याला तुम्ही पोळी देऊ शकता.
- स्वयंपाकघरात तयार होणारी पहिली पोळी गायी किंवा कुत्र्याला दिल्यास घरातील सर्व समस्या कमी होतात, असे सांगितले जाते.
- वास्तुशास्त्रानुसार, मोजून पोळ्या बनवल्याने घरात गरिबी येते.
- अन्न हे देवी अन्नपूर्णेचे रूप आहे. त्यामुळे मोजून पोळ्या बनवल्यास अन्नाचा अपमान समजला जातो.
- मोजून पोळ्या बनवल्याने उदारतेची भावना कमी होऊ शकते.
- शिळ्या कणकेच्या गोळ्या बनवू नयेत. असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
हेही पाहा –
https://www.youtube.com/watch?v=ukv0janidgu