संजय राऊतवरील गुलाब्राव पाटील: संजय राऊत (Sanjay Raut ) पांढऱ्या पायाचा माणूस आहे. ते जिथं जातील तिथं सगळं संपत असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी केली. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील शिंदे गटाचे पाच आमदार पाडण्याचे आव्हान देत संजय राऊत जळगावमध्ये आले होते. मात्र त्यांना उमेदवार सुद्धा मिळत नव्हते. ते एकही आमदार पाडू शकले नाहीत असे पाटील म्हणाले.
महानगर पालिका निवडणुकीत आता ते काय करतील असा प्रश्न आहे. संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे. ते जिथे जातील तिथे सगळं संपत असल्याची खोचक टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जे त्यांच्या आजूबाजूला होते, ते सुद्धा यांच्यावर नाराज असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. यांच्याकडे कोणीही बघायला तयार नाही. ते जसे आले तसेच महानगर पालिकेच्या निवडणुकीत देखील माघारी जातील असे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच आगे आगे देखो होता है क्या असेही ते म्हणाले. वेळ काही लांब नाही असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
महायुतीच्या माध्यमातून आम्ही महापालिकेच्या निवडणुका लढण्याचा आमचा विचार आहे. पण जशा निवडणुका जवळ येतील तस तशी आम्ही तुम्हाला याबाबतची माहिती देऊ असेही गुलाबराव पाटील म्हणाले. सुरेशदादा जैन यांनी सागळ्या गोष्टीमधील राजकारण सोडून दिलं आहे. जे लोक चांगले काम करत आहेत, त्यांच्या पाठिशी सुरेशदादा जैन राहतात असे गुलाबराव पाटील म्हणाले. संजय राऊत कितीही लाडा लबाड्या करायला गेले तरी काही परिणाम होणार नाही. सुरेशदादांना सध्या राजकारणाशी काही देणंघेणं नाही. सुरेशदादा जैन हे सगळ्यांसाठी ज्येष्ठ आहेत. आमच्यासाठी देखील ते ज्येष्ठ आहेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदीबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील मंत्री गुलाबरकाव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मराठी हा आमच्यासाठी अस्मितेचा भाग आहे. मरपाठी ही बोलली पाहिजे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. सरनाईक यांनी त्यांचा विचार मांडला असेल असेही गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, कृषीमंत्री मामिकराव कोकाटे यांनी कृषी क्षेत्राबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास गुलाबराव पाटील यांनी नकार दिला. याबाबत मला काही माहिती नसल्याचे पाटील म्हणाले.
अधिक पाहा..