भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या बहुप्रतिक्षित नियुक्त्या 13 मे रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या. पहिल्या यादीत 78 पैकी 58 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र, वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता असल्यानं अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी वेटिंगवर ठेवण्यात आल्या होत्या. आता राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची यादीची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे.
Pankaj Deshmukh Death Case : पंकज देशमुख यांच्यासोबत घातपात झाल्याचा पत्नीचा आरोपआमदार संजय कुटे यांचे वाहनचालक पंकज देशमुख यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीने मोठा दावा केला आहे. पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याची मला दाट शक्यता आहे, असा आरोप त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी केला आहे. त्यांचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांना ते आत्महत्या करतील, असे वाटत नाही. त्यांच्या तपास योग्य पद्धतीने सुरू आहे, असे मला वाटत नाही. सीआयडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुनीता देशमुख यांनी केली आहे.
Food Distribution Office : प्रतिकूल हवामानामुळे तीन महिन्यांचे अन्नधान्याचे लाभार्थ्यांना आगाऊ वाटपपावसाळ्यात निर्माण होणाऱ्या प्रतिकूल हवामानामुळे अन्नधान्य वितरणात अडथळा येऊ नये, म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत ऑगस्ट 2025 पर्यंतच्या अन्नधान्याचे आगाऊ वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 30 मे रोजीपर्यंत धान्याची उचल पूर्ण करणे आणि 30 जूनपर्यंत वाटप पूर्ण करणे आवश्यक आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 या तीन महिन्यांचे अन्नधान्य लाभार्थ्यांना एकत्रितपणे मिळणार असून लाभार्थ्यांनी वेळेत अन्नधान्य उपलब्ध करुन घेण्याचे आवाहन अहिल्यानगर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
Ahilyanagar News : CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील विशेषांक प्रकाशितपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या प्रकाशनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.
Nandurbar Update : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं निकृष्ट काम; हाताने रस्ता उखडून काढता येत असल्याचा आरोपनंदूरबारच्या अक्राणी तालुक्यात सुरू असलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची काम निकृष्ट दर्जाची होत असल्याचं समोर येत आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत, या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. धडगाव तालुक्यातील सोन, कात्री, खुंटामोडी, वरखेडी, खर्डा, मुंदलवड, मनवानी, काकर पाटी या गावात अतिशय निर्त्कृष्ट दर्जाची कामे झाल्याचं निरीक्षण स्थानिक ग्रामस्थांनी नोंदवलं आहे. प्रशासनानं या कामांची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Shahajibapu Patil : शहाजी बापू पाटील यांचा नवीन एसटी बसमधून प्रवास'काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल', या डाॅयलाॅगमुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज नव्या कोऱ्या एसटी बसमधून प्रवास केला. एसटी महामंडळाने सांगोला आगाराला नवीन पाच बसगाड्या दिल्या आहेत. आज माजी आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते नवीन बसगाड्याचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले.
Palghar Crime Update : पालघर भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखलपालघर जिल्ह्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण केली असून, मारहाणीत महिला विवस्त्र झाल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असलेले नंदकुमार पाटील याच्यावर लोकसभा संघटक म्हणून जबाबदारी आहे . नंदकुमार पाटील याच्यासह त्यांच्या भावांवर वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Nashik Crime Update : कर्ज फेडण्यासाठी मित्राच्या घरी घरफोडी; 38 लाखांचा मुद्देमालासह चौघांना बेड्यामोबाइल, घराचे कर्ज फेडण्यासाठी एका मित्राने दुसऱ्या मित्राच्याच घरी, घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गुन्हे शाखा पथकाने ही कारवाई करीत चौघांना पकडून त्यांच्याकडून 38 लाख 58 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी 25 किमी अंतरावरील सीसीटीव्ही तपासत चोरांचा माग काढला. नाशिकमधील पखाल रोडवरील गुलशन कॉलनीतील रहिवासी अंजुम बिसमिल्ला कुरेशी यांच्या घरी 24 ते 26 मे रोजी चोरांनी घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने व दोन लाख रुपयांची रोकड, असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Mumbai Accident : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, तर दोघं गंभीर जखमीमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटात भीषण अपघात झाला असून, गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव कारनं ची कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन महिलाचा, तर जखमींमध्ये एका चिमुकल्या मुलाचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात डस्टर कारचा चक्काचूर झाला असून, पालघरच्या मनोर पोलिस ठाणे हद्दीत हा अपघात झाला आहे.
Nashik APMC : नाशिक बाजारसमितीच्या उत्पन्नात घट, पिंगळेंचा आरोपनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात सुमारे ४० लाख रुपयांची मोठी घट झाल्याचा आरोप देवीदास पिंगळे यांनी केला आहे. देवीदास पिंगळे यांनी या घटनेमागे प्रशासनातील गंभीर अनियमितता व भ्रष्टाचार असल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
sanjay raut : तेव्हा तोंडाला कुलूप लावून का बसले, आशिष जयस्वाल यांनी राऊतांना फटकारलं.संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते काहीही बोलतात आणि लिहतात. भविष्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यापासून सावध राहावे असा सल्ला देऊन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी छगन भुजबळ तुमच्याही मंत्रिमंडळात होते, तेव्हा तोंडाला कुलूप लावून का बसले होते अशा शब्दात संजय राऊतांना फटकारले.
Radhakrishna Vikhepatil : मंत्री झाल्यावर जास्त बोलायचे नसतेकृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे वादात सापडत आहेत. अशात राधाकृष्ण विखे पाटील यांनी माणिकराव कोकाटे यांना एक सल्ला दिला आहे. मंत्री झाल्यावर जास्त बोलायचे नसते असा सल्ला विखे पाटील यांनी माणिकरावांना दिला आहे. “माणिकराव कोकाटे हे मोकळ्या स्वभावाचे आहेत. त्यांच्या मनात काही नसते. ते फटकळपणे बोलतात. पण मित्र म्हणून त्यांना हा सल्ला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
Sanjay Raut : शरद पवार धर्मांध आणि जातीय शक्तींसोबत जाणार नाहीत - संजय राऊतदोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत ठाकरेंच्या शिवसनेनेचे खासदार संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "या सर्व चर्चा हवेतल्या आहेत. मी स्वतः या मताशी ठाम आहे की, शरद पवारसाहेब शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेने चालतात आणि ते यशवंतराव चव्हाणांचा वारसा राज्यात आणि देशात चालवत आहेत. ज्या राज्यात धर्मांध आणि जातीय शक्ती वाढल्या आहेत, त्या शक्तींसोबत पवारांसारखा आदर्श नेता जाईल, असं आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटत नाही."
Vaishnavi Hagwane Case : निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर आज त्याला कार्टात हजर करण्यात आलं होतं, त्यावेळी सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने त्याला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वैष्णवीचं बाळ निलेशने कोणत्या अधिकरावर घेतलं, तसंच त्याच्याकडून पिस्तूल आणि मोबाईल डेटा जप्त करायचा आहे, यासाठी त्याची कोठडी पोलिसांनी मागून घेतली आहे.
ShivendraRaje Bhonsle : मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे फेसबुक पेज हॅकसातारचे आमदार तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे मंत्री शिवेंद्रराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांकडून या हॅकरचा शोध सुरू आहे. दरम्यान, पेजवर आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन भोसलेंच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवातकोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणावर आज पहाटेपासून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण केलेल्या भागावर कारवाई सुरू असून अतिक्रमणे हटवण्यात येत आहे. 31 मे पूर्वी गड किल्ल्यांवरील अतिक्रमण मुक्त करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यांनी दिलेली मुदत आज संपत होती. त्यामुळे अतिक्रमणाबाबत जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेत कोल्हापूर पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. अतिक्रमण केल्यापैकी 64 जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामध्ये 14 अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुन्हा पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली होती. नंतर अतिक्रमणधारक सहकार्य करत असून अतिक्रमण काढण्यास मदत करत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे
दाभडी गावात ३ जून रोजी काँग्रेसचे ‘क्या हुआ तेरा वादा’? आंदोलनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ११ वर्षात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्यामंध्ये वाढ होत आहे, दररोज ६ शेतकरी आत्महत्या होत आहेत. मोदींनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्ष ३ जून रोजी यवतमाळमधील दाभडी गावात ‘क्या हुआ तेरा वादा’? असा प्रश्न विचारत पदयात्रा काढणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
राज्य महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन कराराज्य महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन करा, अशी मागणी मनसेकडून मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. 4-5 दिवसांत मनसेचे शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राज्यात पुरुषांचा छळ, खोट्या केसेस दाखल करणे यांसारखे प्रकार सर्रास सुरू त्यामुळे पुरुषांना दाद मागण्यासाठी राज्यपुरुष आयोगाची गरज असल्याचे पत्र मनसे नेते आशिष साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
रोहित पवारांकडून चौंडी येथे महापूजाअहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आमदार रोहित पवारांकडून चौंडी येथे महापूजा करण्यात आली. रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर एकाच वेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या दर्शनाला दोघेही एकाच वेळी दर्शनाला आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
निलेश चव्हाणला पुणे सत्र न्यायालयात हजर केले जाणारवैष्णवी हगवणे प्रकरणात फरार आरोपी निलेश चव्हाण याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून अटक केली. निलेश चव्हाणला आज (शनिवारी) पुणे सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. निलेशवर वैष्णवीच्या आई वडिलांना बंदूक दाखवत धमकावल्याचा तसेच वैष्णवीच्या नऊ महिन्याची बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे.
शासकीय कर्मचारी महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभमाझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शासकीय सेवेत असलेल्या तब्बल 2652 महिलांनी घेतल्याचे समोर आले आहे. या महिला कर्मचाऱ्यांनी तब्बल 3 कोटी 58 लाख रुपयांचा लाभ घेतला. हे पैसे सरकारकडून वसुल करण्यात येणार आहे. दरम्यान, फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना आणल्या की काय होतं हेच यातून सिद्ध होतं. पण आतातरी सरकारने संबंधित योजनेतील गैरप्रकारांना आळा घालावा आणि निवडणुकीत ₹१५००चे ₹२१०० करण्याचं दिलेलं आपलं आश्वासन पूर्ण करावं, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.