आयपीएलच्या 18 व्या मोसमातील क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. पंजाब विरुद्ध मुंबई 1 जून रोजी आमनेसामने असणार आहेत. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल. हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबईचं नेतृत्व आहे. तर श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघात कोण वरचढ आहे? तसेच खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 33 वेळा आमनेसामने आले आहेत. एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मुंबई इंडियन्स 33 पैकी सर्वाधिक 17 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पंजाब किंग्सने मुंबईवर 16 वेळा पलटवार केला आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
दोन्ही संघ 18 व्या मोसमातील साखळी फेरीत एकदाच आमनेसामने आले होते. पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यात 26 मे रोजी सामना झाला होता. तेव्हा पंजाबने मुंबईवर मात केली होती. त्यामुळे पलटण क्वालिफायर-2 सामन्यात पंजाबचा धुव्वा उडवत साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे इथे हायस्कोअरिंग सामना होण्याची शक्यता आहे. तसेच सामन्यात स्पिनरला मदत मिळू शकते. टॉस जिंकणारा संघ बॉलिंगचा निर्णय घेऊ शकते. कारण इथे विजयी धावांचं आव्हान करणं सोपं ठरु शकतं. या मैदानात 200 पेक्षा अधिक स्कोअर केल्यास दोन्ही संघात जोरदार चुरस पाहायला मिळू शकते. आतापर्यंत या स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेतील एकूण 41 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 20 सामने पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर 21 वेळा दुसर्या डावात बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे.
पंजाब किंग्सने या स्टेडियममध्ये आतापर्यंत 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 2 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. पंजाबने या मैदानात 2 वेळा विजयी धावांचा पाठलाग यश मिळवलं आहे. तर 1 वेळा पहिल्या डावात बॅटिंग केल्यानंतर विजय मिळवला आहे.
तर दुसऱ्या बाजूला मुंबईची या स्टेडियममधील आकडेवारी चिंताजनक आहे. मुंबईने या स्टेडियमधील 5 पैकी 4 सामने गमावले आहेत. तर एकदाच विजय मिळवता आला आहे. मुंबईने हा एकमेव विजय पहिल्या डावात बॅटिंग केल्यानंतर मिळवला आहे.