पंतप्रधान मोदींचे पुन्हा पाकिस्तानला आव्हान : दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना कडक संदेश
वृत्तसंस्था/ भोपाळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना कडक संदेश दिला आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचे रक्त सांडले नाही तर आपल्या संस्कृतीवरही हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांनी भारताच्या महिला शक्तीला आव्हान दिले होते. हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या पोशिंद्यांसाठी काळाचा अंत बनले आहे. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांच्या अ•dयांमध्ये घुसून त्यांना नेस्तनाबूत केले आहे. भारताच्या अशाप्रकारच्या हल्ल्याचा पाकिस्तानने विचारही केला नव्हता. पण, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ऑपरेशन आहे. भविष्यातही भारताविरोधात कोणताही कट रचला तरी गोळीबाराला गोळ्यानेच उत्तर दिले जाईल, असा कडक संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. तसेच, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी काही प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर लाखो भगिनींना संबोधित करताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला आव्हान दिले आहे. गोळीबाराला गोळ्यांनी उत्तर दिले जाईल. सिंदूर हे भारताच्या शौर्याचे प्रतीक बनले आहे, असे ते म्हणाले. सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला आपल्या बीएसएफच्या मुलींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, बीएसएफच्या मुलींनी अद्भूत शौर्य दाखवल्याची आठवणही त्यांनी करून दिली. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण महिला शक्तीवर केंद्रित होते. त्यांनी देशाच्या विकास आणि सुरक्षेत महिलांच्या वाढत्या योगदानाबद्दल परखडपणे भाष्य केले.
‘मोदी-मोदी’चे नारे, अन् मोदी शांत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्ही गोळी चालविली तर गोळीचे उत्तर तोफगोळ्यांनी दिले जाईल असा इशारा देताच उपस्थित लोकांनी ‘मोदी-मोदी’चे नारे सुरू केले. गर्दीतून येणारा आवाज आणि घोषणाबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शांतपणे ऐकू लागले. उपस्थित लोकांचा उत्साह पाहून ते हसत राहिले. महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वजण ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा बराचवेळ देत होते.
मुलींसाठी सैनिक शाळेचे दरवाजे खुले
आपल्या सैन्याने आता मुलींसाठी सैनिक शाळेचे दरवाजे उघडले आहेत. काल देशात एक नवा इतिहास रचला गेला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी उत्तीर्ण झाली आहे. आज लढाऊ विमानांपासून ते विक्रांत युद्धनौकांपर्यंत सर्वत्र मुली आहेत, असे मोदी म्हणाले.
माता-बागिनिना वंदना.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम भारताच्या मातृशक्ती माता-भगिनींना वंदन केले. आज इतक्या मोठ्या संख्येने माता, भगिनी आणि मुली आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येथे आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तुम्हा सर्व बहिणींचे दर्शन घेण्याचा मला आनंद आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आमचे सरकार आज प्रत्येक घरात पाणी पुरवत आहे. जेणेकरून महिलांना कोणतीही अडचण येऊ नये आणि मुली शिक्षण घेऊ शकतील. आमच्या सरकारने वीज, एलपीजी सारख्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. माता आणि बहिणींचा आदर करण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे गावातील बहिणींच्या अनेक समस्या कमी झाल्याचे मोदी म्हणाले.
सरकारी योजनांची माहिती
2014 पूर्वी, 30 कोटींहून अधिक बहिणी ज्यांचे बँक खाते नव्हते, आम्ही खाती उघडली. आता योजनेचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जातात. त्या आता पैसे कमवत आहेत, स्वयंरोजगार करत आहेत. त्यांना मुद्रा हमीद्वारे कर्ज मिळत आहे. योजनेच्या लाभार्थ्यांपैकी 75 टक्के महिला आहेत. 10 कोटी बहिणी बचत गटांशी संबंधित असून त्या काही ना काही उपक्रम करतात. आम्ही बहिणींना लाखो रुपयांची मदत करत आहोत जेणेकरून त्यांना पुढे नेले जाईल. आम्ही तीन कोटी बहिणींना लखपती बहिणी बनवण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत दीड कोटी बहिणी लखपती झाल्या आहेत. गावागावातील बँक सखी आता अधिकाधिक लोकांना बँकांशी जोडत आहेत. सरकारने विमा सखी बनवण्याची मोहीम सुरू केल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
महिलांना संधींची अनेक द्वारे खुली
एक काळ असा होता जेव्हा नवीन तंत्रज्ञान आले तेव्हा महिलांना त्यापासून दूर ठेवले जात असे. आज आपला देश त्या युगाला मागे टाकत आहे. आज सरकार आपल्या बहिणींना आधुनिक तंत्रज्ञानात योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. शेतीमध्ये ड्रोन क्रांती येत आहे. आज आपल्या मुली मोठ्या संख्येने शास्त्रज्ञ बनत आहेत. त्या डॉक्टर, पायलट बनत आहेत. विज्ञान गणित शिकणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे. संपूर्ण देशाला चांद्रयान 3 मोहिमेचा अभिमान आहे. त्यात 100 हून अधिक महिला शास्त्रज्ञांचा सहभाग होता. स्टार्टअप्समध्येही मुली मोठे काम करत आहेत. धोरण ठरवण्यात मुलींचा सहभाग वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी देशात अनेक पावले उचलण्यात येत असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.