हिंदी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रीचे असे काही किस्से आहेत की, ते खूप चर्चेचा विषय ठरले आहे. दरम्यान बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री होती, तिचं लग्नानंतर सुद्धा दिलीप कुमार यांच्यासोबत अफेअर होतं. तसंच या अभिनेत्रीने स्वत:च्या भाऊजींसोबत लग्नगाठ बांधली होती.
या अभिनेत्रीचं नाव आहे कामिनी कौशल, ती आज सुद्धा अनेक चित्रपटात पहायला मिळते. काही दिवसांपूर्वी कामिनी कौशल 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात पहायला मिळाली होती. तिचा जन्म लाहौरमध्ये झाला होता. दोन भाऊ आणि तीन बहिणींमध्ये ती सर्वात छोटी होती.
कामिनीचे वडिल शास्त्रज्ञ होते. त्यांना 'फादर ऑफ इंडियन बॉटनी' या नावाने ओळखलं जायचं. जेव्हा कामिनी 7 वर्षांची होती तेव्हा त्यांचं निधन झालं. कामिनीचं लग्न तिच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याशी झालं होतं. तिच्या बहिणीचं एका अपघातात मृत्यू झाला होता. तिला दोन मुली होता. त्यामुळे कुटुंबाच्या दबावामुळे त्या मुलींसाठी तिने मोठ्या भाऊंजीसोबत लग्न केलं.
कामिनी लग्नानंतर मुंबईत आली. तिचे पती बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये चीफ इंजिनिअर होते. लग्नानंतर कामिनी कौशल तीन मुलांची आई झाली. कामिनीला अभिनयाची प्रचंड आवड होती. 1946 मध्ये तिने 'नीचा नगर' चित्रपटात काम केलं. त्यानंतर ती 'शहीद' चित्रपटातून दिलीप कुमारसोबत पहायला मिळाली. या चित्रपटानंतर त्यांच्यात जवळीक वाढली, आणि दिलीप कुमार आणि कामिनी एकमेकांच्या प्रेमात पडले.
जेव्हा कामिनीच्या भावाला तिच्या एक्स्ट्रा अफेअरबद्दल माहिती झालं. तेव्हा त्याने दिलीप कुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. कामिनीचा भाऊ बंदुक घेऊन सेटवर सुद्धा आला होता. तसंच बहिणीला धमकावत देत दिलीप कुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान कामिनी कौशलने 2014 मध्ये एका मुलाखतीत सांगितलं की, 'दिलीप कुमार यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये लिहलं होतं की, दोघे वेगळे झाल्यानंतर दिलीपकुमार पुर्ण एकटे पडले होते. परंतु ती बहिणीला धोका देऊ शकत नव्हती त्यामुळे तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं' त्यांनी बायोग्राफीमध्ये म्हटलय.