कांद्याच्या दरात वाढीची शक्यता! अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान
ET Marathi June 01, 2025 09:45 PM
Onion Price Hike : राज्यात मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, बीड, पुणे, बुलढाणा, अकोला, परभणी आणि जालना या जिल्ह्यांतील कांद्याचे पीक वाया गेले. शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. कांदा उत्पादक संघटनांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.



अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याचे पीक वाया गेले आहे. काढणीला आलेला कांदा पावसामुळे खराब झाला. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.



सरकारकडे मदतीची मागणीमहाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने सरकारकडे धाव घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि नाशिक जिल्हा प्रमुख जयदीप भदाणे यांनी या पत्रावर सही केली आहे.



संघटनेने सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. 'शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जावी", अशी मागणी त्यांनी केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवला होता, पण तो पावसामुळे खराब झाला, त्यांना "प्रति क्विंटल २,००० रुपयांचे अनुदान मिळावे', अशी मागणी देखील करण्यात आली आहे.



पावसामुळे कांदा साठवणे खूप कठीण झाले आहे. शेतात ठेवलेला मोठ्या प्रमाणात कुजला आहे. हजारो टन कांदा वाया गेला आहे. याचा थेट फटका शेतकर्‍यांना बसला आहे.





कांद्याचे भाव वाढण्याची शक्यताकांद्याचे उत्पादन घटल्यामुळे बाजारात भाव वाढण्याची शक्यता आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्यास भाव वाढतात, हे यापूर्वीही दिसून आले आहे. सरकारने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Onion Rate Today)



कांदा उत्पादक संघटनेने NAFED (राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) आणि NCCF (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) यांना एक विनंती केली आहे. "केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्यात यावा", असे त्यांनी म्हटले आहे. "यासाठी ३ लाख टन कांदा ३,००० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करावा", अशी मागणी त्यांनी केली आहे.



अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर, कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनाही फटका बसू शकतो.



३१ मे २०२५ रोजी राज्यातील महत्वाच्या बाजारपेठांमधील कांद्याचे घाऊक दर

बाजारपेठ किमान दर (रु./क्विंटल) कमाल दर (रु./क्विंटल) सरासरी दर (रु./क्विंटल)
पुणे (मोशी) ₹400 ₹1600 ₹1000
छत्रपती संभाजीनगर ₹20000 ₹100000 ₹60000
पुणे (पिंपरी) ₹1100 ₹1500 ₹1300
छत्रपती संभाजीनगर ₹15000 ₹130000 ₹72500
धुळे ₹20000 ₹100000 ₹90000
लासलगाव (विंचूर) ₹500 ₹1652 ₹1300
शेवगाव ₹600 ₹1000 ₹800
जळगाव ₹300 ₹1412 ₹892
लासलगाव ₹600 ₹1920 ₹1380
पिंपळगाव ₹650 ₹2251 ₹1450


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.