Maharashtra Politics live Update : नवी मुंबईतील घनसोली डेपोत उभ्या असलेल्या चार बस पेटल्या
Sarkarnama June 04, 2025 09:45 PM
दोन महिला तलाठी लाच घेताना 'लाचलुतपत'च्या जाळ्यात

वडिलोपार्जित शेती पत्नीच्या नावावर करण्यासाठी 16 हजारांची लाच घेताना नांदेडमधील दोन महिला तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. भाग्यश्री तेलंगे आणि सुजाता गवळी, लाच घेणाऱ्या महिला तलाठ्यांची नावं आहेत. तलाठी भाग्यश्री तेलंगे हिने प्रथम 40 हजारांची, तर तडजोडीनंतर 17 हजारांच्या लाचेची मागणी केली. पथकाकडे याची तक्रार झाल्यानंतर रक्कम स्वीकारतानाच दोघींना पैसे घेताना पकडण्यात आले. या तलाठी महिलांच्या नांदेड व किनवट इथल्या घरांची झडती सुरू असून पोलिस ठाणे किनवट इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ranjit kasle Filed Case : रणजित कासलेवर गुन्हा दाखल

पोलिसांनी अटक केलेल्या निलंबित पीएसआय रणजित कासले कासले याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कासले याने व्हिडिओ करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले होते. फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आता बीड सायबर पोलिस ठाण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील घनसोली डेपोत उभ्या असलेल्या चार बस पेटल्या

नवी मुंबईतील घनसोली बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बसला आग लागली. यानंतर ही आग पसरत जाऊन बाजूला उभ्या असलेल्या डिजेल बसला लागली. डेपोमधील चार बस आगीत भस्मसात झाल्याची माहिती समोर येत आहे. डेपोतील बसला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून पाण्याचा मारा केला जात आहे. ही आग नेमकी कशानं लागली, याचं अद्याप कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. परंतु सुरूवातीला इलेक्ट्रिक बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते.

आंदोनासाठी शिंदे-ठाकरेंची शिवसेना एकत्र

कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष एकत्र आला आहे. दुर्गाडी किल्ल्यावरील आंदोलन त्याला निमित्त ठरले आहे. दोन्ही पक्ष तसेच हिंदुत्वावदी संघटना या एकत्र येऊन या ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहेत.

दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी समजणार

मतदानाच्या आकडेवारीवरून नेहमीच आरोप प्रत्यारोप करण्यात येतात. कधीकधी मतदानाची मतदानाच्या दिवशी चार ते पाच तासांनी आकडेवारी जाहीर केले जाते. कधी कधी फायनल आकडेवारी दुसऱ्या दिवशी जाहीर केले जाते. मात्र, आता दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या अॅपवर जाहीर केली जाणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.