पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मनसेची महत्त्वाची बैठक झाली. पुण्यातील शहर कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडली. पुणे महानगरपालिकेतील सर्व जागांवर मनसे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मनसे पुणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. राज ठाकरे 9 जून रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांची पुण्यात ते बैठक घेणार आहेत. या बैठकीत शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होणार असल्याची माहिती देण्यात आली.
Sudhakar Badgujar : गुन्ह्याच्या शिक्षेमुळे हकालपट्टी होत असेल तर काय बोलणार ?शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते सुधाकर बडगुजर यांनी काल नाराजी व्यक्त करत मनातील खदखद बोलून दाखवली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर बुधवारी त्यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पक्षाच्या या कारवाईनंतर आता सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. आणि जर त्या गुन्ह्याच्या शिक्षेचं हकालपट्टीमध्ये रुपांतर होत असेल तर त्याचं उत्तर मी काय देणार ? असा सवालच बडगुजर यांनी विचारला आहे.
Girish Mahajan: संजय राऊत नैराश्यातून टीका करताहेत :शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. या टीकेला आता मंत्री महाजन यांनी उत्तर दिले आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना मी एकदाही फोन केला नाही. तशा स्वरूपाचे वक्तव्य संजय राऊत यांनी नैराश्यातून केले असल्याचे मत महाजन यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.
गिरीश महाजन मंत्रिमंडळातील सर्वात भ्रष्ट मंत्री : संजय राऊतगिरीश महाजन यांना मंत्रिमंडळात घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू-संतांचं महामंडळ तयार केलं आहे, त्यातले एक गिरीश महाजन आहे, अशीही टीका यावेळी राऊतांनी केली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, कुंभमेळ्याच्या बैठकीच्या निमित्ताने गिरीश महाजन अनेक साधूसंतांच्या पाया पडत होते. पण त्यांनी त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदे व प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ईडी पीडित साधूसंतांच्या पाया पडले पाहिजे, अशी टीका राऊत यांनी केली