चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
Marathi June 06, 2025 02:24 AM

गोंदिया : वन्य प्राण्यांची शिकार करणे किंवा त्यांना विना परवाना सांभाळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे. गडचिरोली, चंद्रपूरगोंदिया, भंडारा भागातील जंगलात अनेकदा वन्य प्राण्यांची शिकार करुन त्यांचे मांस खाल्ल्याचे किंवा विक्री, तस्कीरी केल्याचे प्रकार घडतात. वन विभागाच्या (Forest) या हालचालींवर बारकाईने लक्ष असते. मात्र, वन विभागाच्या डोळ्यात धूळफेक करत वन्य प्राण्यांची शिकार केली जाते. नुकतेच, गोंडिया (गोंडिया) जिल्ह्याच्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या जांभळी येथे चितळ प्राण्याची शिकार करून त्याचा मांस शिजवून खात असलेल्या चौघांना सडक अर्जुनी वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी, चारही आरोपींना 7 जूनपर्यंत वन विभागाच्या कोठडीत ठेऊन अधिक तपास करण्यात येत आहे.

सडक अर्जुनी वन विभागाअंतर्गत जांभळी गावात चितळ प्राण्याची शिकार झाल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर, वन विभागाच्या पथकाने आरोपी लालचंद मेश्राम याच्या घराची चौकशी केली असता एका जर्मन भांड्याच्या गंजीमध्ये चितळाचे मास शिजवलेले आढळले. त्यावरुन, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अधिक तपास करत चितळची शिकार करुन मांस खाणाऱ्या चौघांना अटक केली आहे. वन विभागाच्या पोलिसांनी चितळचे मांस शिजवून खाल्ल्याच्या प्रकरणात आणखी चौकशी केली असता अन्य तीन आरोपींची नावे समोर आली. त्यानंतर,वन विभागाच्या पथकाने इतर तिघांनाही अटक केली आहे. लालचंद मेश्राम, आनंद शेंद्रे, संतोष शेंडे आणि पुरणलाल जगनित असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या चारही आरोपींना 7 जूनपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, घटनेचा पुढील तपास सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा

खेळणं, जिंकणं यापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा; RCB जल्लोष, चेंगराचेंगरीवर गौतम गंभीरचं परखड भाष्य

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.