जिंक्य रहाणेची गणना भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने नेहमीच परदेशी भूमीवर चांगली कामगिरी केली आहे. आज रहाणे 37 वर्षांचा झाला आहे. आज तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 1988 मध्ये आपल्या महाराष्ट्रात झाला. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिका 2-1ने जिंकली. त्यानंतर भारताने मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात गाबा मैदानावर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
अजिंक्य रहाणेने त्याच्या सुवर्ण कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 12 शतके झळकावली आहेत. जेव्हा जेव्हा त्याने कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावले, तेव्हा टीम इंडियाने ती कसोटी गमावलेली नाही. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन शतके, वेस्ट इंडिज, श्रीलंका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी दोन कसोटी शतके झळकावली. शिवाय रहाणेने इंग्लंडविरुद्ध कसोटी शतक झळकावले. तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत WTC शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने एकही कसोटी गमावली नाही
अजिंक्य रहाणेने एकूण 6 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली, त्यापैकी 4 सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आणि दोन सामने अनिर्णित राहिले. जेव्हा जेव्हा त्याने कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा भारतीय संघाने एकही कसोटी सामना गमावला नाही.
अजिंक्य रहाणे सध्या भारतीय संघाबाहेर आहे. टीम इंडियामध्ये अनेक तरुण खेळाडूंनी त्याची जागा घेतली आहे. त्याने 2023 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. त्याने आतापर्यंत 85 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 5077 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 12 शतके आणि 26 अर्धशतके आहेत. याशिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2962 धावा आहेत. तर त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 375 धावा केल्या. अलीकडेच त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले.