सचिन जाधव, साम टिव्ही
पुणे : पुण्यात शिरूरमध्ये काही दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तीन मृतदेह आढळले होते. आता या घटनेतील आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. मृत महिला व तिच्या नवऱ्यामध्ये नेहमी भांडण होत होते. त्यामुळे आरोपी गोरख बोखारे हा त्यांच्यामधील वाद मिटवत असे. त्याचदरम्यान आरोपी गोरख बोखारे आणि मृत स्वाती सोनवणे यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले. त्यामुळे स्वाती ही गोरख बोखारे याच्याकडेल लग्न करण्याची मागणी करत होती.
आरोपीने मोटरसायकलवर मृत स्वाती सोनवणे व तिच्या दोन्ही मुलींना आळंदीतून घेऊन सरहद वाडी येथे आला. रात्रीच्या वेळी रांजणगाव गणपती गावाजवळ बंद असलेल्या कंपनीत कच्च्या रोडलगत थांबून स्वाती आणि तिच्या दोन्ही मुलांना गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी १२ दिवसांतच गुन्ह्यातील आरोपीला पकडलं आहे. विशेष बाब म्हणजे, पुणे ग्रामीण पोलिसांनी महिलेच्या हातावर असलेल्या जय भीम राजरत्न, मॉम, डॅड आणि आर.एस या टॅटूच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेतला.
२७ कर्मचाऱ्यांच्या टीमसह २५० सीसीटीव्ही तपासून १६ हजार ५०० भाडेकरू कडून माहिती घेतली. ज्याठिकाणी मृतदेह सापडले त्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांकडे तपास केला. सहा पथक तयार करून त्यांना तपासला पाठवलं. कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक व कोकण परिक्षेत्रात तपास केला. तसेच पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनमधील ३३ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील प्रत्येकी कामाला तपास करत होता. अखेर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.