वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानचा सूड उगविण्यासाठी हाती घेतलेल्या ‘सिंदूर’ अभियानाला शुक्रवारी एक महिना पूर्ण झाला आहे. शनिवारी या अभियानाच्या द्वितीय महिन्याचा प्रारंभ झाला. या अभियानाचा प्रथम भाग भारताने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. हे अभियान थांबलेले नाही, हे स्पष्ट करण्यात आले असून पाकिस्तानने पुन्हा भारताला छेडल्यास त्याला पुन्हा याहीपेक्षा मोठा धडा दिला जाणार आहे.