Maharashtra News Live Updates : बदलापूर नगरपरिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं
Saam TV June 11, 2025 06:45 PM
भारतात राहायचे की पाकिस्तानात, दाम्पत्याचा वाद विकोपाला

नवी मुंबईतील खारघर परिसरात पाकिस्तानी पत्नीचा तिच्या पतीने चाकूने वार करून खून करून, त्यानंतर चाकूने स्वतःवर वार करून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी समोर आली आहे. दोघेही पती-पत्नी हिंदू आहेत.

Badlapur: बदलापूर नगरपरिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं

येत्या तीन ते चार महिन्यात बदलापूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण बदलापूर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भातील आदेश नगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांची धाकधुक वाढलीय. आपला प्रभाग राहणार की नवा प्रभाग शोधावा लागणार? याचं टेन्शन सर्वच राजकीय पक्षातल्या इच्छुक उमेदवारांना आलय. दुसरीकडे 2022 सालीच नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे हीच प्रभाग रचना कायम राहील अशीही शक्यता आहे.

धुळे रेस्ट हाऊस कॅश प्रकरणावरून गोटे यांनी फडणवीसांवर साधला निशाणा...

धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणासंदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेवरून माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे,

सिग्नल तोडला तरी यापेक्षा जास्त शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे आणि त्यापेक्षाही हे प्रकरण कमी आहे काय असा संतप्त प्रश्न माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्य सरकारला विचारला आहे,

वर्ध्यात वादळाने अख्खी केळीची बाग केली उद्धवस्त

- शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

- सुरगावातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान

- पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी

- सुरगाव, पवनार, नालवाडी यासंह परिसरातील गावांना वादळी पावसाचा फटका

अँकर - वर्धा जिल्ह्याच्या वर्धा व सेलू तालुक्यात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सेलू तालुक्याच्या सुरगावात केळीची बाग पूर्णपणे उध्वस्त झालीय. शेतकऱ्याच्या शेतातील पाच हजार केळीच्या झाडापैकी अडीच हजार झाडे कोलमडून पडलीय. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून भरपाईची मागणी करण्यात आलीय.

मला जीन्सवाला आमदार म्हणायचे- पंकज भोयर, राज्यमंत्री

मला जीन्सवाला आमदार म्हणायचे... असा किस्सा सांगितलं..

सकाळची क्षमतेएवढा वाढला नाही, सकाळ फॉन्ट आणि लेआऊट हे इतर वृत्तपत्रापेक्षा वेगळं आहे...

आज देशाचा विकासात तरुणाईच महत्व आहे, सामाजिक संघटना असों की राजकीय पक्ष युथ विंग तयार करत असते.. कारण वातावरण बदलण्याची क्षमता आहे,

सकाळने यीनची स्थापना करून हे काम करत आहे.. मी इकॉनॉमी स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष झालो, तिथं भाषण द्यायचो,

भाषण देतांना मनात भीती असायची, रात्रभर भाषण पाठ करायचो, अशी परिस्थिती होती. माझा संपर्क काही संस्था सोबत आलो, आता भीती राहिली नाही.. आपली क्षमता जाणून योग्य दिशेने नेऊ शकतो यासाठी काम केलं पाहिजे..

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने क्रांती चौक येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा

छत्रपती संभाजी नगर मध्ये आज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने क्रांती चौक येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. एवढाभरापासून मराठवाड्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात या आंदोलनांतर्गत वेगवेगळी आंदोलन केली जात आहेत. आज छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकातून विभागीय आयुक्तालय हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारने जी आश्वासन निवडणुकीमध्ये दिली होती, त्याचे अद्याप पर्यंत पूर्तता केली नाही कोणतीही काम सरकारने केले नाही असा आरोप या आंदोलनातून करण्यात येतोय. आज या आंदोलनामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात उतरले होते.

पुण्यात गाड्यांची जाळपोळ

पुण्यातील नऱ्हे परिसरात जाळण्यात आल्या गाड्या

पुण्यात मध्यरात्री अज्ञात इसमांकडून पेटवण्यात आल्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी

घटनेत ७ दुचाकी वाहने आगीच्या भक्षस्थानी

आगीत वाहनांच मोठं नुकसान

नऱ्हे गावातील सिद्धेश्वर प्लाझा या सोसायटीमध्ये पार्किंग मध्ये लावलेल्या दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ फवारून आग लावण्याची धक्कादायक घटना

पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

सलग दुसऱ्या दिवशी समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन

जालना नांदेड समृद्धीत संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणीसाठी जालन्यातील शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.आज सलग दुसऱ्या दिवशी जालना मंठा रोडवर समृद्धीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन केलय. जालना मंठा रोडवरील रामनगर येथे समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळपास तासभर रस्ता रोको आंदोलन करून जेलभरो आंदोलन केलय. यामुळे जालना मंठा रोडवर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. दरम्यान सरकारने आमच्या जमिनीला योग्य मोबदला द्यावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Maharashtra News Live Updates : बच्चू कडू यांच्या प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना अकोला पोलिसांनी घेतलं ताब्यात

बच्चू कडू यांच्या प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना अकोला पोलिसांनी घेतलं ताब्यात.. प्रहारच्या शहराध्यक्ष मनोज पाटील यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्हा दौऱ्यावर आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज काळे झेंडे दाखवण्याचा इशारा प्रहारने दिला होता..

दरम्यान, बच्चू कडू यांच अमरावतीत अन्यत्याग आंदोलन सुरू आहे.. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी त्यांच आंदोलन होत आहे.. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रहार आक्रमक होत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता..

त्यानंतर अकोला पोलिसांच्या स्थानिक पोलीस शाखेचे पथकाने प्रहारचे महानगर अध्यक्ष मनोज पाटील यासह विविध पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घरातच नजरकैद ठेवले होते.. मात्र प्रहारचे पदाधिकारी आपल्या इशारावर ठाम असल्यामुळे अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र आपल्याला जरी तब्येत घेतल असले तरी कार्यकर्ते बाहेर आहेत, ते नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात गोंधळ घालतील असं मला विश्वास असल्याच मनोज पाटील.

रस्ते अपघातात व्हेटर्नरी डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली सेनगाव राज्य मार्गावर रस्ते अपघातात एका व्हेटर्नरी डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे , बालाजी महादू शिंदे असे या व्हेटर्नरी डॉक्टरचे नाव असून ते हिंगोली शहरातील गणेशवाडी भागातील रहिवासी आहेत धक्कादायक बाब म्हणजे शिंदे यांचा पुसेगाव पाटी जवळील रस्त्याच्या बाजूला अपघात घडल्यानंतर रात्रभर त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही त्यामुळे बालाजी शिंदे यांची दुचाकी जखमी अवस्थेत असलेल्या बालाजी यांच्या अंगावर रात्रभर तशीच होती सकाळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना अपघात झाल्याची माहिती समजल्यानंतर ही दुचाकी बाजूला करत बालाजी यांचा मृतदेह उचलण्यात आला दरम्यान शिंदे यांच्या नातेवाईकांनी मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्याने पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

बच्चू कडू यांचे वजन 3 किलोने कमी तर रक्तदाब वाढलेला

बच्चू कडू यांचे वजन 3 किलोने कमी तर रक्तदाब वाढलेला आहे...

बच्चू कडू यांचा उपोषणाचा आज चवथा दिवस

तीवसा उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकाकडून बच्चू कडू यांची वैद्यकीय तपासणी

बच्चू कडू यांची तब्बेत खालावत चालली आहे

बच्चू कडू यांचा रक्तदाब वाढलेला आहे.

शुगर 104 आहे.

Temp 97.4

वजन 84 kg

4 चौथ्या दिवशी बच्चू कडू यांचे वजन 3 किलो ने कमी झालेले आहे.

बच्चू कडू यांच्या प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ठेवलं नजरकैद

बच्चू कडू यांच्या प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ठेवलं नजरकैद.. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्हा दौऱ्यावर आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज काळे झेंडे दाखवण्याचा इशारा प्रहारने दिला होता..

दरम्यान, बच्चू कडू यांच अमरावतीत अन्यत्याग आंदोलन सुरू आहे.. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी त्यांच आंदोलन होत आहे.. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रहार आक्रमक होत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता..

त्यानंतर अकोला पोलिसांच्या स्थानिक पोलीस शाखेचे पथकाने प्रहारचे महानगर अध्यक्ष मनोज पाटील यासह विविध पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घरातच नजरकैद ठेवले आहे..

मेंढपाळांच्या वस्तीवर सशस्त्र दरोडा; दरोडेखोरांच्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी

नगर तालुक्यातील विळद गावच्या शिवारात मेंढपाळांच्या वस्तीवर आठ ते नऊ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत दोन महिला आणि दोन पुरुष अशा चौघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. लक्ष्मण सूळ, प्रकाश सुळ, सुमन सूळ, शितल होडगर अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरोडेखोरांनी रोख रक्कम सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा एवेज लंपास केला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात अनेक जणांचा बळी देखील गेला असून या दरडोखोरांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी आक्रमक

नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा व जोरदार पावसामुळे शेकडो एकर वरील केळी बागा बागा भुई सपाट झाल्या आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नांदेड - हिंगोली महामार्गावर अर्धापूर येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाल यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. तसेच नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून तात्काळ पंचनामे देण्याचे आदेश दिले आहेत.

बॉक्साईड वाहतुकीमुळे म्हसळ्याच्या घोणसे घाटात अपघातजन्य परिस्थिती

म्हसळ्याच्या घोणसे घाटात बॉक्साईडची वाहतुक करणाऱ्या ट्रकमुळे अपघात जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे रस्ता ओला होत असून रस्त्यावर सांडणाऱ्या बॉक्साईडच्या मातीमुळे चिखल निर्माण होत आहे. या चिखलामुळे रस्ता निसरडा झाला असून वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रिमझिम पावसात वाहन घसरण्याचा त्रास अधिक होत आहे. रस्त्यावरील या परिस्थितीमुळे प्रवाशी आणि पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे उत्खननाला परवानगी देणारा महसुल विभाग आणि रस्ता सुरक्षा जपणार पोलिस प्रशासन डोळे झाकून गप्पा का बसले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची ही अपघातजन्य परिस्थिती लक्षात घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात कराहुनवी सण साजरा

सोलापूर जिल्हा हा कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात असल्या कारणाने कर्नाटक राज्याची संस्कृती सभ्यतेच सोलापूर मध्ये कारहुनवी सणाच्या निमित्ताने दर्शन होते.

महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा केला जातो अगदी तशाच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमावर्ती भागात कारहुनवी हा सण साजरा केला जातो.

पावसाळा ऋतू सुरु होण्याआधी पेरणीचा काळ असतो त्याच्या अगोदर हा सण साजरा केला जातो.शेतकरी राजा करहुनवी सणाला शेतात रबणाऱ्या बैलाची सेवा करतो,बैलाची रंग रांगोटी करून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते आणि आज बैलाची पूजा करून पुरणपोळीचा नैवैद्य बैलाला दिला जातो.

संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी ५१ हजार लाडूंचा महाप्रसाद

वाशिमच्या रिसोड शहरात आज सायंकाळी श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा दाखल होणार आहे. या निमित्ताने रिसोड येथील श्री संत गजानन महाराज पालखी उत्सव समितीच्या वतीने तयारी सुरू असून,वारकऱ्यांसाठी महाप्रसादात लाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी ५१ हजार लाडू तयार करण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यात आज रिसोड शहरात गजानन महाराजांच्या पालखीचा चौथा आणि शेवटचा दिवस असून रिसोड येथून मुक्काम झाल्यानंतर सकाळी पालखी मराठवाड्याच्या हिंगोलीकडे मार्गस्थ होते.

भाजप नेते नारायण राणे धाराशिवच्या दौऱ्यावर, आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार

नितेश राणे यांच्या धाराशिव दौऱ्यातील वक्तव्यावर काय बोलणार याकडे लक्ष

नितेश राणेंच्या धाराशिव दौऱ्यातील भाजपचा मुख्यमंत्री सर्वांचा बाप या वक्तव्याने निर्माण झालाय वाद

सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा

कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा , भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणेंनी केलं होतं वक्तव्य

मनसे नेते प्रकाश महाजन आणि राणे कुटुंबामध्येही रंगलाय शाब्दिक कलगीतुरा, त्यावरही नारायण राणे बोलणार का याकडेही लक्ष

- सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या

- ओंकार हजारे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अजित पवार गटाच्या सरचिटणीस पदावर होता.

- अज्ञात कारणावरून ओंकार हजारे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

- रविवारी रात्री ओंकार हा आपल्या गाडीत बेशुद्धा अवस्थेत आढळून आला.

- कुटुंबियांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने बेशुद्धावस्थेतच तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

- ओंकार याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.

- दरम्यान ओंकार यांच्या मृत्यू संदर्भात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

- पुढील तपास फौजदार चावडी पोलिस स्टेशन अधिकारी करतायत.

पुण्यात ॲप डाऊनलोड करून गमावले दोन लाख,कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात सायबर गुन्हा दाखल

बँकेचे स्टेटमेंट पाहण्यासाठी गुगलवर शोध घेणाऱ्या नागरिकाला सायबर चोरट्याने ॲप डाऊनलोड करायला सांगून त्याच्या खात्यातून दोन लाख रुपये लंपास केल्याचा प्रकार समोर आलाय.

या आर्थिक फसवणुकीमुळे हातबल झालेल्या नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी 58 वर्षे व्यक्तीने तक्रार दिली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटना 4 जूनला दुपारी 12 ते 5 या वेळेत घडली आहे.

सोलापूर जिल्ह्यात सुरु असणारा वादळी वारा आणि पावसामुळे बागायत शेतीला बसला फटका

सोलापूर जिल्ह्यात सुरु असणारा वादळी वारा आणि पावसामुळे बागायत शेतीला बसला फटका

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावातील अडीच एकर केळीची बाग बाग झाली आडवी

ऐन काढणीला आलेली 4 हजार केळीची झाड वादळीवाऱ्यात झाली भुईसपाट

सतीश अर्जुन गादेकर या केळी उत्पादक शेतकऱ्याला अस्मानी संकटामुळे सहन करावा लागतोय 20 ते 25 लाखांचे नुकसान

त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत.

लाच प्रकरणी अटकेत असलेले उपायुक्त साबळे यांनी मिळवलेले दिव्यांग प्रमाणपत्र बोगस

सात लाखांची लाच मागितल्या प्रकरणी अटकेत असणारे सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शासकीय नोकरी मिळवण्यासाठी साबळे यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. इस्लामपूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी साबळेंच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. इस्लामपूर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना साबळे यांनी मोठा गैरकारभार केला असून कर्णबधिर नसताना देखील साबळे यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं आणि शासकीय नोकरी मिळवली. माझी आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर साबळे यांनी कर्णबधीर असल्याचं दाखवण्यासाठी खोटा श्रवणयंत्र वापरण्यास सुरुवात केल्याचा आरोप देखील कुंभार यांनी केला आहे.साबळे यांच्या आज पर्यंतच्या कारभाराची आणि प्रमाणपत्राची चौकशी करावी,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याचे देखील कुंभार यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यातील धायरी येथे बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला, नांदेड सिटी पोलिसांनी केले स्थानबद्ध

साजन विनोद शहा असे या  सराईत गुन्हेगाराचे नाव आहे

या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करत आहेत.

साजनच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक कायद सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.

त्याच्या दहशतीमुळे त्याच्या विरोधात कोणीही तक्रार देण्यास तयार होत नव्हते.त्यामुळं अखेर पोलिसांनी साजन शहा याच्यावर स्थानबद्धेची कारवाई केली.

वादळी वाऱ्यात बाभळीचे घरावर कोसळले ,जीवितहानी नाही

हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळी व रात्री वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे, या वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की हिंगोली तालुक्यातील अंभेरी गावात नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून शेत शिवारात पडले होते तर याच गावातील सखुबाई पाईकराव

यांच्या घरावर बाभळीचे मोठे झाड कोसळल्याने राहत्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे, वादळी वारे आल्याने घरातील नागरिकांनी शेजारच्या घरात आसरा घेतल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहनी झाली नाही मात्र संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे पावसाने भिजले होते.

गोकुळ अध्यक्ष नविद मुश्रीफ आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे असा आग्रह माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा होता. त्यानुसार अध्यक्षपदावेळी वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. यातून निश्चित समजल्या जाणाऱ्या दोघा संचालकांना अध्यक्षपदापासून बाजूला राहावे लागले. यानंतर अध्यक्षासह संचालक मुंबईला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नव्हती. ही भेट पुढील आठवड्यात घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार आज दुपारी बारा वाजता सह्याद्री अतिथी ग्रहावर अध्यक्ष नवीद मुश्रीफ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत वाशी इथल्या मदर डेरीची जागा मिळण्यासह अन्य प्रश्नांबाबत मुश्रीफ हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.

लाचलुचपत विभागाने कारवाई केलेल्या बीड जिल्ह्यातील एकुण 52 लाचखोरांचे प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रलंबित

बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या लाचखोरांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी दिलेले एकुण 52 प्रस्ताव प्रलंबित आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याच्या संदर्भात दिलेल्या आदेशानंतर राज्यातील आकडेवारी आली समोर.

गृह आणि महसुल विभागाकडे बीड जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकरणं प्रलंबित तर वर्ग 1 च्या 4 आणि वर्ग 2 च्या 6 लाचखोरांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

वर्षानुवर्षे सक्षम परवानगीसाठी प्रस्ताव प्रलंबित असल्याने दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यास अडथळा येत असल्याचं ACB च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

राज्यातील एकूण 366 तर एकट्या बीड जिल्ह्यातील 52 लाचखोरांचे प्रस्ताव प्रलंबित.

लातूर नांदेड महामार्गावर भीषण अपघात

लातूरच्या अहमदपूर येथील लातूर नांदेड बायपासला कार आणि बसचा भीषण अपघात झाला आहे.. अपघातात कारमधील तीन प्रवासी गंभीर रिता जखमी झाले आहेत, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.. दरम्यान जखमींना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र पुढील उपचारासाठी जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले आहे..

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून डॉक्टरांची चौकशी होणार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशीच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे संगीता खरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता याला डॉक्टर जबाबदार आहेत नातेवाईकांनी आणि युवा सेनेने गंभीर आरोप महापालिकेच्या हॉस्पिटल वर करण्यात आला होता यावेळेला युवा सेनेने सुद्धा जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेत आयुक्तांकडून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे त्यामुळे हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर आता महापालिका कारवाई करणार आहे

- गेल्या 10 दिवसात नागपूर शहरात कोरोना चे 15 नवे रुग्ण

- मनपाच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली

- १ जानेवारी ते ३१ मे या पाच महिण्यात १७ रुग्ण तर जूनच्या गेल्या १० दिवसात नव्याने १५ नवे रुग्ण...

- यातील १३ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती

- उपचार सुरू असलेल्या रुग्णात सौम्य लक्षण असून बहुतेक रुग्ण गृहवीलगिकरणात उपचार घेत आहे

संत गजानन महाराजांची पालखी वाशिमच्या किनखेडा येथे दाखल

वाशिम मध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचा आजचा वाशिम जिल्ह्यातील चौथा दिवस आहे. पालखीने सकाळी मसला पेन येथून प्रस्थान करत संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा किनखेडा येथे पोहोचलाय. सकाळीच किनखेडा परिसरातील नागरिकांनी पालखी सोहळ्याच भक्ती मय वातावरण स्वागत केलय. गण गण गणात बोते आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात वाशिम जिल्हा नाहून निघतोय.

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार

- चारच्या प्रभाग रचनेमुळे नागपूर मनपात १५१ सदस्य संख्या कायम राहणार

- 2017 च्या प्रभाग रचनेत फारसा बदल होण्याची शक्यता नाही

- 2011 च्या जनगणनेनुसार निवडणूक होणार, त्यामुळे प्रभाग संख्या आणि सदस्यसंख्या वाढण्याची शक्यता नाही, 10 टक्के कमी अधिकची मुभा असणार आहे.

- गेले तीन टर्म नागपूरात भाजपची सत्ता, यावेळेसंही प्रभाग रचना कोणाच्या फायद्याची ठरणार आणि बाजी मारणार का? याकड लक्ष असणार आहे.

आयटीआयची प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जूनला, तर अंतिम यादी ३ जुलैला होणार जाहीर

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.

आयटीआय अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी तीन जुलै रोजी जाहीर होणार आहे.

आयटीआय प्रवेशासाठी चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत.

राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या प्रवेशासाठी चार फेऱ्या राबविण्यात येणार असून त्यानंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आणि खासगी आयटीआयमधील संस्था स्तरावरील प्रवेश होणार आहेत.

या प्रक्रियेतील प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी जाहीर होणार आहे.

पुणे रेल्वे विभागात रेल्वे अपघात धक्कादायक माहिती

जानेवारी 2024 ते मे 2025 या सतरा महिन्यांच्या कालावधीत पुणे विभागात रेल्वे अपघातात तब्बल 49 जणांचा बळी गेला, तर 109 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे पुणे विभागही रेल्वेप्रवासी आपली मरणयात्राच करीत आहेत, हे वास्तव आहे.

सन 2024 या संपूर्ण वर्षात 107 जण रेल्वेतून पडले होते, त्यापैकी 35 जणांनी जीव गमावला आणि 72 जण जखमी झाले.

विशेष म्हणजे, 2025 च्या पहिल्या पाच महिन्यांतच 51 जण रेल्वेतून पडून अपघातग्रस्त झाले, यात 14 जणांचा मृत्यू झाला आणि 37 जण जखमी झाले. याचा अर्थ अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी ती चिंताजनकरीत्या कायम असल्याचे दिसते.

मुंबई लोकलमध्ये घडलेल्या अपघातांची पुनरावृत्ती पुणे विभागातही होत आहे. गर्दीच्या वेळी दरवाजातउभे राहणे, धावत्या रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा धोकादायक प्रयत्न करणे, यामुळेच जीवघेणे अपघात घडत आहेत.

प्रवाशांनी, विशेषतः युवकांनी आपल्या सुरक्षिततेची गंभीर दखल घेणे आणि रेल्वे प्रवासाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या एका क्षणाच्या चुकीमुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

कल्याण बदलापूर रोडवरील सुझुकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग

कल्याण बदलापूर रोडवरील अंबरनाथ ऑर्डन्स कंपनी समोरील सिमरन सुझुकी या शोरूमला रात्री तीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली, आगीची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दल, उल्हासनगर अग्निशमन दल, ऑर्डन्स कंपनी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, लागलीच पाच बंबांच्याद्वारे सकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही आग विझवण्यात आली, या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून,वित्त आणि मोठ्या प्रमाणात झाली आहे, सुझुकी गाड्यांचे शोरूम असलेल्या या शोरूम मध्ये 100 व अधिक नवीन गाड्या जळून खाक झाल्या आहेत, ही आग कशामुळे लागली या बाबतीत माहिती पुढे आलेली नाही,

यवतमाळ जिल्ह्यातील नऊ तालुक्यात वादळाचा हाहाकार

यवतमाळ जिल्ह्यातील नऊ तालुक्यात काल सायंकाळी अचानक झालेल्या वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान झाल्याचे समोर आले असून घाटंजी ते पारवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडल्याने रस्ता बंद झाला होता.दिग्रस तालुक्यातील डेहणी येथे संत्रा,मोसंबीची झाडे जमीनदोस्त झालीये.पुसद तालुक्यातील मानिक फुके यांच्या शेतातील केळीच्या बागेचं अतोनात नुकसान झाले असून उमरखेड आणि पुसद तालुक्यात 21 हेक्टर वरील पिकांना फटका बसलाय.सोसाटय़ाच्या वाऱ्याने आर्णी,दिग्रस,घाटंजी,यवतमाळ आदी तालुक्यातील पोल पडल्याने अजूनही अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा बंद आहे.

तुळजाभवानी माता छञपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे शिल्प साकारण्याच्या प्रक्रीयेला गती

तुळजाभवानी मंदीर व परीसराच्या १८६५ कोटींच्या विकास आराखड्याला राज्यसरकारने मान्यता दिल्यानंतर आता कामांना गती मिळाली असुन या आराखड्यातील प्रस्तावित असलेल्या तुळजाभवानी माता छञपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे 108 फुट उंचीचे शिल्प साकारण्याच्या प्रक्रीयेला गती मिळाली आहे.यासाठी मंजुरी मिळाली असुन कलासंचनालयाच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट महीन्यापर्यंत देशातील मुर्तीकारांनी उदाहरण म्हणून अडीच ते तीन फुट उंचीचा पुतळा प्रतिकृती कला संचालनालयाचे सादर करावा करण्याचे आवाहन केल आहे.यासाठी 45 दिवसांचा अवधी देण्यात आला असुन निवडणक पाच डिझाईन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली निवडण्यात येणार आहे.

सात वर्षांपासून नळाला पाणी न आल्याने यावर्षीची पाणी कर माफ करा...

मेहेकर तालुक्यातील डोणगाव येथे कायम स्वरूपी पाणी मिळावे यासाठी मागील सात वर्षा अगोदर 3 कोटी रुपयाची जल जीवन मिशन योजना मंजूर करून अर्धवट काम करण्यात आले.. ठेकेदाराने अर्धवट काम करून पूर्ण बिल काढून पळून गेला मोठा आर्थिक भ्रष्टाचार केला गेला.. या योजनेचे पाणी डोणगाव वासियांना मिळालेच नाही.. मात्र दरवर्षी ग्रामपंचायत पाणी कर सक्तीने वसुल करीत होती यावर्षी ग्रामस्थ आक्रमक झाले व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्याचे नेते शैलेश सावजी यांनी अमरावती आयुक्तांना निवेदन देत सात चर्षांपासून योजनेचे एक थेंब पाणी मिळालेच नाही त्यामुळे यावर्षी चा पाणी कर रद्द करावा अशी मागणी केली अन्यथा ग्रामपंच्यायत मध्ये बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा देण्यात आला .. त्यानुसार शैलेश सावजी यांनी डोणगाव ग्रामपंच्यायत मध्ये बैठा सत्याग्रह सुरु केला असून जोपर्यंत सणपूर्ण गावाचा पाणी कर रद्द होत नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे..

'वणीत एकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई'

यवतमाळच्या वणीतील मटका किंग म्हणून परिचित असलेले जमीर खान उर्फ जम्मू यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेवरून पोलिसांनी ताब्यात घेत बारा महिन्यासाठी भंडारा येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.या कारवाईने जिल्हा पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर आल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू आहे.

Maharashtra News Live Updates : आज बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह 17 मागण्यासाठी बच्चू कडू यांचं अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मध्ये सुरु आहे अन्नत्याग आंदोलन.

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, भारतीय किसान युनियन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील,राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांचा पाठिंबा

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, आमदार रोहित पवार, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर भेट देणार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.