राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 26 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार खासदारांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षातील अनेक नेत्यांनी भाषणेही गाजवली.
राष्ट्रवादीच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी पक्षाच्या भविष्यातील दिशा, नव्या नेतृत्वाची गरज, आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी स्पष्ट आणि प्रभावी भूमिका मांडली.
यावेळी शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाचा विचार केला जाईल,असं स्पष्ट केलं.
याचवेळी त्यांनी पुढच्या तीन महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून: महिलांच्या प्रतिनिधित्वावर भर देण्याचा आहे.
याच पार्श्वभूमीवर पवारांनी स्थानिकच्या निवडणुकांमध्ये पक्षात 50 जागा महिलांसाठी राखीव असतील अशी मोठी घोषणा केली.
शरद पवारांनी स्थानिक निवडणुकांसाठी केलेली राखीव जागांची घोषणा ही लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट मानलं जात आहे.
"कोणी आले आणि गेले तरी फरक पडत नाही, आपण एकसंध राहिलो तर सत्ता येते, हा आमचा अनुभव आहे,"आगामी निवडणुकीमध्ये चित्र नक्कीच बदलेल असा देखील विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला