मांडवी किनारा स्वच्छतेचे वाजले तीन तेरा
esakal June 13, 2025 01:45 AM

-rat१२p१४.jpg-
२५N७००८१
रत्नागिरी : मांडवी किनाऱ्यावर साचलेल्या कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्लास्टिकच्या वस्तू आहेत. यामुळे जलचरांचेही अस्तित्व धोक्यात येत आहे.
-rat१२p१३.jpg-
२५N७००८०
रत्नागिरी : शहरातील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर साचलेल्या कचऱ्याने निसर्गसौंदर्याला बाधा पोहोचत आहे.
-rat१२p१५.jpg-
२५N७००८२
रत्नागिरी : किनाऱ्यावर मोकाट गुरेसुद्धा वावरताना दिसत आहेत.
-rat१२p१६.jpg-
२५N७००८३
रत्नागिरी : कचऱ्यामुळे पर्यटक किनाऱ्याकडे पाठ फिरवतात.
----
कचऱ्याच्या गर्तेत अडकला मांडवी किनारा
मांडवी किनाऱ्याच्या स्वच्छतेचे वाजले तीनतेरा
वाढत्या कचऱ्यामुळे पर्यटकांची पाठ ; व्यवसयिकांना फटका, कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : शहरातील मांडवी समुद्रकिनारा प्रचंड प्रमाणावर आलेल्या प्लास्टिक कचरा आणि अन्य विविध प्रकारच्या कचऱ्याने व्यापला आहे. या किनाऱ्याच्या स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून, पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक रहिवाशांनाही याचा त्रास होत आहे. पालिकेकडून तात्पुरती स्वच्छता केली जाते; परंतु कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पूर्वीच्या काळात गेट वे ऑफ रत्नागिरी असे संबोधले जाणारे मांडवी आहे. येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. मांडवी किनाऱ्यावर चार मोठी हॉटेल्स आहेत. सुमारे भेळ, पाणीपुरी, कणीस, शहाळी विक्री करणारे २० विक्रेते आहेत तसेच लहान मुलांसाठी पाळणे, घोडा गाडी आदी खेळाचे प्रकार असलेले व्यावसायिक आहेत.
मांडवीच्या पर्यटन विकासासाठी आतापर्यंत फारसे प्रयत्न झाले नाहीत. मांडवी जेटीची सुधारणा करण्यात आली, संरक्षक बंधारा बांधण्यात आला; परंतु किनारा स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मांडवी किनारा स्वच्छतेची जबाबदारी रत्नागिरी शहरातील एका नामवंत कंपनीकडे दिली होती. त्यांनी सीएसआर फंडातून खर्च करावा, असे सांगण्यात आले होते तसेच याचा फलकसुद्धा मांडवीत लावण्यात आला होता. काही वर्षे नियमित सफाईसुद्धा होत होती; परंतु संरक्षक बंधाऱ्याच्या कामावेळी हा फलक काढून टाकला. त्यानंतर जिल्हाधिकारी बदलले आणि कंपनीचे व्यवस्थापनही बदलले. त्यामुळे आता स्वच्छतेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यटक, स्थानिक रत्नागिरीकरांना फिरणेसुद्धा कठीण झाले. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे कचरा साचल्यानंतर स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी व नागरिकांनी पुढाकार घेत स्वच्छता केली होती; परंतु त्यानंतरही पालिकेकडून स्वच्छता होत नसल्यामुळे पर्यटन व्यवसायावरसुद्धा परिणाम होत असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले.
---
कोट
पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी सर्व व्यावसायिक प्रयत्न करतात. काही वर्षांपूर्वी येथील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक रात्री कचरा गोळा करून ठेवत; परंतु कचरागाडी दुसऱ्या दिवशी सकाळी येत असे; परंतु आता नवीन मुख्याधिकारी आल्यानंतर त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर कचरागाडी रात्री ९ वाजता येऊ लागली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनीही महत्त्वाच्या सूचना पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कचऱ्यासाठी फोन केला की, जेसीबी येतो.
- सुहास ठाकूरदेसाई, रत्नागिरी

चौकट १
सर्वच किनाऱ्यांवर कचरा
रत्नागिरीतील सर्वच किनाऱ्यांवर कचरा येत असतो; परंतु त्याची स्वच्छता दररोज होणे आवश्यक आहे. भाट्ये किनाऱ्यावर मशिनद्वारे स्वच्छता केली जाते; परंतु मांडवीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मशिन येऊनही अजून त्यामार्फत स्वच्छता झालेली नाही. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या माध्यमातून हे मशिन चालवले पाहिजे; परंतु पालिकेकडे प्रशिक्षित चालक नसल्याने हे मशिन पालिकेतच पडून असल्याचे बोलले जात आहे.

चौकट २
ये रे माझ्या मागल्या
मांडवी किनाऱ्याची नियमित स्वच्छता होण्याची आवश्यकता आहे; परंतु याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पर्यटन विकासावर भर दिला जात असताना किनारा स्वच्छतेकडे का दुर्लक्ष केले जाते, याचे कोडे अद्याप उलगडले नाहीये. तसेच वृत्तपत्रांमध्ये बातमी आल्यानंतर दखल घेतली जाते. त्यानंतर थोडे दिवस स्वच्छता होते नंतर ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती असते, असे येथील नागरिकांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.