तामिळनाडूच्या एका गावात अजब प्रकार
चोरांच्या कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. परंतु तामिळनाडूतीच्या श्रीरंगम तालुक्यातील रामजी नगर गावात चोरी करणे एक परंपरा आणि पेशा मानले जाते. या गावातील एक पूर्ण टोळी पिढ्यानपिढ्या केवळ चोरी करत आहे, तसेच चोरीला ते धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा मानतात.
रामजीनगरच्या या टोळीचे वैशिष्ट्या म्हणजे ते चोरीला केवळ एका गुन्हा मानत नाहीत, तर पूर्वजांपासून प्राप्त एक परंपरा मानतात, आजोबांनी केले, वडिलांनी निभावले आणि आता नातू ही परंपरा पुढे नेत आहे. जेव्हा हे लोक चोरीसाठी गावातून बाहेर पडतात, तेव्हा सर्वप्रथम पूजा आणि उपवास करतात. ईश्वर आणि पूर्वज प्रसन्न असतील तर चोरी नक्की यशस्वी ठरेल असे ते मानतात. चोरीला जाण्यापूर्वी हे लोक स्वत:च्या पूर्वजांकडून आशीर्वाद मागतात.
महागड्या कार्सवर नजर
टोळीचे प्लॅनिंग एखाद्या प्रशिक्षित गुन्हेगारापेक्षा कमी नसते. हे लोक प्रथम त्या भागाचा अभ्यास करतात. तसेच ते महागड्या कार्सना प्रामुख्याने लक्ष्य करतात. जेव्हा कुठे आलिशान कार दिसली, टोळीचे सदस्य तेथे पोहोचून संधीची प्रतीक्षा करतात आणि मग दगड किंवा विशेष अवजारांनी कारची खिडकी तोडताफ आणि आतील मूल्यवान सामग्री लॅपटॉप, रोख रक्कम, मोबाइल आणि घड्याळ घेऊन पसार होतात. हे अत्यंत इतक्या सफाईने करतात की आसपासच्या लोकांना काहीच कळत नाही.
जामिनासाठी राखीव रक्कम
या टोळीचे सदस्य परस्परांमध्ये सांकेतिक भाषेत बोलतात. म्हणजेच ही एक खास प्रकारची भाषा असते, जी गावाबाहेरील लोकांना समजत नाही. यामुळे पोलिसांना त्यांच्या नेटवर्कचा शोध घेण्यास मोठा कालावधी लागतो. चोरीनंतर हे लोक केवळ चोरीचा माल समान वाटत नाही, तर प्रत्येक सदस्य काही रक्कम वेगळी काढून ठेवतो. ही रक्कम हे लोक अटक झाल्यास जामिनासाठी ठेवत असतात. यामुळे जामिनावेळी त्यांना पैशांची कमतरता भासत नाही.