मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघाताला सोमवारी (ता.१६) एक आठवडा पूर्ण होत आहे. या दुर्घटनेत चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर नऊ प्रवासी जायबंदी झाले आहेत. एका धोकादायक वळणावर गर्दीने खचाखच भरेलेल्या दोन लोकल विरुद्ध दिशेने एकमेकांजवळ आल्याने ही दुर्घटना घडली.
ही दुर्घटना मुंब्रा स्थानकाजवळ घडली असली तरी त्यानिमित्ताने ठाणे पल्ल्याड रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्यरेल्वेचा उपनगरीय सेवेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. खासकरून ठाणे ते कसारा मार्ग धोकादायक कसा बनला आहे, यावर दैनिक सकाळने घेतलेला हा आढावा
२०२४ वर्षभरातील मृत्यूधावत्या लोकलमधून पडून / रुळ ओलांडताना
ठाणे १५,१६८
डोंबिवली ५,४३९
कल्याण १,०४, ११६
२०२५ जानेवारी ते मार्चपोलिस ठाणे धावत्या लोकलमधून पडून / रुळ ओलांडताना
ठाणे - ४,४१४
डोंबिवली १,४०७
कल्याण २,४२८
लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, ऐरोली ही रेल्वे स्थानके येतात. तर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, भिवंडी, खारबाव, कामनरोड आणि जुचंद्र ही रेल्वे स्थानके येतात.
रेल्वे पोलिसांच्या अंतर्गत कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वाशिंदे, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा अशी सर्वाधिक रेल्वे स्थानके येतात. या रेल्वे स्थानकांच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या अपघातांची नोंद संबंधित लोहमार्ग पोलीस ठाण्यात होत असते. या अपघातांचा आढावा घेतला असता सर्वाधिक रेल्वे अपघात हे कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे उघडकीस आले आहे.