Latest Maharashtra News Updates : नळदुर्ग नगर परिषद कार्यालयावर नागरिकांनी काढला गाढव मोर्चा
esakal June 16, 2025 08:45 PM
Tuljapur Live: नळदुर्ग नगर परिषद कार्यालयावर नागरिकांनी काढला गाढव मोर्चा

तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग शहरात गेली पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरीकांनी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात गाढव मोर्चा काढुन पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय,यावेळी शहरातील क्रांती चौक,चावडी चौक,बसवेश्वर चौक,जय भवानी चौक मार्गे हा मोर्चा नगर पालिका येथे धडकला यावेळी हातामध्ये फलक घेत नागरीक यामध्ये सहभागी झाले होते.

Pune Live : पुणे शहरातील सर्व नदी, कॅनल, ओढ्याचे ऑडिट करा, भाजपची महापालिका आयुकांकडे मागणी

मावळ येथील पूल दुर्घटनेनंतर पुणे शहरातील सर्व नदी, कॅनल आणि ओढ्यांवरील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करा

पुणे शहर भाजपची महापालिका आयुकांकडे मागणी

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची पुणे शहर भाजपच्या कोअर कमिटीने घेतली भेट

भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने केली मागणी

पुणे शहरातील सर्व नदी, कॅनॉल, ओढ्यावरील धोकादायक पुलांचे तातडीने स्ट्रकचरल ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट करावे हे केली मागणी

Pune Live : पुण्यात कोंढवा येथील मुनोत प्राथमिक विद्यालय अचानक बंद

पुण्यात कोंढवा येथील मुनोत प्राथमिक विद्यालय अचानक बंद केल्याने विद्यार्थी आणि पालक शाळेच्या गेटवर ताटकळत थांबले.

संस्थाचालकाने विद्यालय शाळा बंद केली असून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला आहे.

साठ टक्के अनुदानित आणि शाळेत मोठी विद्यार्थी संख्या असतानाही शिक्षक कर्मचारी आणि संस्थाचालकांच्या वादामुळे शाळा बंद केली आहे.

जवळपास तीनशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.

आज शाळेचा पहिला दिवस असताना शाळा बंद केल्याने पालक संतप्त

Raigad Live : रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट, मुंबईत 100 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरीमध्ये सर्वाधिक म्हणजेच 112 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 110 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. येत्या 24 तासात रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हयाला ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. मुंबईत सुद्धा 100 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Pune Live : कोथरूड भागात गटाराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ

पुण्यातील उच्चभ्रू कोथरूड भागात असलेल्या ३ ते ४ सोसायटी मध्ये गटारीचे पाणी शिरले असल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. शहरात गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे याच मुळे शहरातील अनेक गटार तुंबले आहेत याचाच फटका कोथरूड मधील सोसायट्यांना बसला आहे. सोसायटीच्या पार्किंग मध्ये कंबरेपर्यंत पाणी गेल्यामुळे नागरिकांना आत मध्ये सुद्धा शिरता येत नाहीय. शिवाय गटारीच्या पाण्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलीय.

Pune Live : लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो

मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस पडतोय. लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून तो 100% भरला आहे. गेल्या 24 तासात 143 मिमी पाऊस लोणावळ्यात पडला आहे. पर्यटकांनी भुशी डॅमवर जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

Live : दक्षिणेकडील राज्यात मॉन्सून सक्रिय; झारखंडमध्येही दोन दिवसांत हजेरी, दिल्लीत मोबाईल टॉवर कोसळला

देशभरातील दक्षिणेकडील राज्यांत मॉन्सून सक्रिय झाला असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्याचप्रमाणे ईशान्येकडील झारखंडसह आसपासच्या राज्यातही येत्या दोन दिवसांत मॉन्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे.

दक्षिण दिल्लीतील बी २ सफदरजंग भागात पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रविवारी १०० फूट उंचीचा मोबाईल टॉवर कोसळला. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पहाटे चारच्या सुमारास वेगाने वारे वाहू लागल्यामुळे हा टॉवर कोसळला.

Mumbai Live: घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा झाली सुरळीत

घाटकोपर वर्सोवा मेट्रो सेवा सुरळीत झाली आहे. 20 मिनिट मेट्रोचा खोळंबा झाला होता. ओव्हरहेड वायरच्या तांत्रिक बिघाडामुळे खोळंबा झाला होता. ओव्हर हेड वायरला प्लास्टिक अडकल्याने मेट्रोफहक्त खोळंबा झाला होता 25 मिनिटानंतर मेट्रो सुरु

कशेडी घाटात दरड कोसळली, वाहतूकीवर परिणाम

कशेडी घाटात दरड कोसळली असून त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला आहे

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा दणका

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा दणका बसला आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावरून बच्चू कडू अपात्र झाले आहेत

हा विभागीय सहनिबंधक यांचा निर्णय आहे.

न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा दणका..

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बच्चू कडू अध्यक्ष आहेत

MHT CET Result 2025 Live: PCB चा निकाल उद्या जाहीर केला जाणार असल्याची माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली...

PCB चा निकाल उद्या जाहीर केला जाणार असल्याची माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या स्थितीत आहे - नरेंद्र मोदी

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या स्थितीत आहे, असे पंतप्रधान मोदी सायप्रसमध्ये म्हणाले.

Live Update: ठाकूरद्वार सिग्नलजवळ बेस्ट बस पडली खड्ड्यात, बचाव कार्य सुरू

मुंबईत बेस्ट ची बस पाच फूट खोल खाली खड्ड्यात, गिरगावातील मेट्रो स्थानकाजवळ झाला बेस्ट चा अपघात

Live Update: नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी विकास मंत्र्यांसमोरच आदिवासी विभागाच्या कारभाराच्या काढल्या अनेक त्रुटी, सरकारला दिला घरचा आहेर

- आजचा इतिहासातील पहिला दिवस असेल की मंत्री, अधिकारी जाऊन स्वागत करत आहेत

- 89 टक्के मिळवून पहिली येणारी मुलं आपल्याकडे आहेत

- आज पहिलाच दिवस असल्याने मी एकाच बाजूने बोलणार

- दोन बाजू म्हणजे टोचणे, आमचं सरकार कुठे कमी पडते ते

- मुलांचे दप्तरचे ओझे जास्त झाले आहे ते कमी करण्याचे प्रयत्न करावे लागणार

- 25-30 वर्ष झाले आम्हाला पण आज वाटत होतं की विधानभवनात आलो अस स्वागत केलं

- दुसरी बाजू बघायला गेलं तर आदिवासी कर्मचारी, टीचर यांचे पगार वाढत नाहीत

- आम्हाला सगळंच कळत असं समजत नाही तुम्ही आयुक्त जे देतात ते आम्ही मांडतो

- ईथे स्क्रीन वगैरे लावले नाही मुख्यमंत्री संवाद साधणार होते, त्यामुळे आतमध्ये जाऊन आम्हाला उपस्थित रहावे लागेल त्यामुळे लवकर आवरत घेतो

- आपण आदिवासी सरंक्षक आहोत त्यामुळे पावसाळ्यात उपाययोजना करणे गरजेचे जेणेकरून शिक्षकाना 24 तास राहता येईल

- खर बोला पण आजच्या जमान्यात रेटून खोटं बोलू नका मात्र जे खरं आहे ते तर बोला (फळ, भाज्यांचे उदाहरण देत)

- मंत्री महोदयांचे मी अभिनंदन करतो जाती जमाती आयोग स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला

- बोरवडच्या मुलाला 89 टक्के मिळाले, त्याला 8 वी पासून इंग्लिशला टीचर नव्हत्या, गणिताच्या टीचर इंग्लिश शिकवत होत्या म्हणे.. यानंतर असं व्हायला नको, आयुक्त मॅडम हे तपासा

- मी बर वाईट शिकलो म्हणून आमदार केलं लोकांनी, उईके साहेब तर प्रोफेसर आहेत

- मी घड्याळवाला आहे त्यामुळे टाईमात आलोय (उशिरा आलेल्या मंत्री अशोक उईके यांना टोमणा)

Pune : पालखी सोहळ्यावेळी दिवे घाटातील डोंगरावर चढण्यास बंदी

पालखी सोहळ्या दरम्यान दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी घालण्यात आली आहे. पालखी सोहळ्यावेळी दिवे घाट परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल. रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्याने ब्लास्टिंग द्वारे डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. ब्लास्टिंग मुळे डोंगरावरची माती आणि दगड सैल झाले आहेत. यामुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने हा निर्णय घेतला आहे.

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ; राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली

कोल्हापुरात गेल्या 12 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या दोन तासांत पंचगंगा नदीची पातळी दोन फुटांनी वाढलीय. तर पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली गेला आहे. कोल्हापुरात आज पुन्हा अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Mumbai Rain : पावसामुळे पडलेल्या खड्ड्यात बेस्ट बस अडकली

मुंबईत गिरगावात बेस्ट बस पाच फुट खोल खड्ड्यात अडकल्याची घटना घडलीय. पावसामुळे झालेल्या खड्ड्यात बसचा मागचा टायर अडकला. गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Raigad : माणगाव-रायगड मार्गवर दरड कोसळली, मोठे दगड आले रस्त्यावर

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे माणगाव रायगड मार्गावर दरड कोसळलीय. घरोशी वाडी, पळस गाव इथं ही दरड कोसळली आहे. डोंगरातून मोठे दगड यामुळे रस्त्यावर आले आहेत. सुदैवानं या घटनेत कोणतंही नुकसान झालेलं नाहीय.

Ahmedabad Plane crash Live : अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपासासाठी अमेरिकेचे अधिकारी पोहोचले

अमेरिकन अधिकारी आणि विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) चे अधिकारी अहमदाबादमध्ये पोहोचले. ते आता १२ जून रोजी झालेल्या विमान अपघाताच्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी जात आहेत.

Pune Live : कोथरूडमधील वेद भवन पुलावर ३ ते ४ वाहनांचा अपघात

कोथरूड परिसरात असणाऱ्या वेद भवन येथील पुलावर ३ ते ४ वाहनांचा अपघात झाला आहे. भरधाव येणारी वाहन एकमेकांना धडकली या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखले केले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Mumbai Live : हार्बर लाईनवर वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून याचा परिणाम लोकल ट्रेन वाहतुकीवरही झाला आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने हार्बर लाईनवर वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे.

Pune Kundmala Bridge collapse live : कुंडमळा पूल दुर्घटनेत शोधकार्य थांबविले

जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार काल रात्री उशिरा सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात आल्यामुळे, एनडीआरफकडून शोधकार्य ऑपरेशन बंद करण्यात आले आहे.

10th Students : दहावीच्या विद्यार्थ्याची तुरंबे येथे आत्महत्या

सरवडे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील आर्यन कृष्णात भोईटे (वय १७) याने रविवारी दुपारी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. तो नुकताच दहावी परीक्षा पास झाला होता.

Earthquake in Peru : पेरूमध्ये झालेल्या भूकंपात एकाचा मृत्यू तर ५ गंभीर जखमी

आज सकाळी दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये जोरदार भूकंप झाला, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोक घराबाहेर पडले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर आढळले. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) ने भूकंपाची पुष्टी केलीये.

Belgaum Rain : बेळगावसह काही जिल्ह्यांत मुसळधारेचा अंदाज, किनारपट्टीवर रेड अलर्ट

बंगळूर : पुढील तीन दिवसांत बेळगाव, धारवाड आणि गदग या उत्तरेकडील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. दरम्यान, राज्यात नैऋृत्य मान्सून सक्रिय असल्याने रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Jamboti-Belgaum Road : जांबोटी-बेळगाव रस्ता तिसऱ्यांदा बंद, वाहतूक खानापूरमार्गे वळवली

खानापूर : पश्चिम भागात पावसाने जोर धरल्याने व त्यामुळे मलप्रभा नदीला पाणी आल्याने रविवारी पहाटे अखेर कुसमळी येथील पर्यायी रस्ता पूर्णपणे वाहून गेला. यामुळे बेळगाव-जांबोटी रस्ता तिसऱ्यांदा बंद झाला आहे. नवीन पुलाचे काम अपूर्ण आहे व नदीला पाणी वाढल्याने पुन्हा पर्यायी पूल उभारणे कठीण आहे. त्यामुळे वाहतूक खानापूर मार्गे वळविली आहे.

Kolhapur Municipal Corporation : महापालिका कर्मचारी संघाचा गुरुवारपासून काम बंदचा इशारा, आजपासून निदर्शने

कोल्हापूर : विविध मागण्यांबाबत महापालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काहीच पूर्तता केली नसल्याने महापालिका कर्मचारी संघाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करत गुरुवारपासून (ता. १९) काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा जोर कायम, अनेक भागांमध्ये साचले पाणी

मुंबई : सकाळी ६:३० वाजल्यापासून मुंबई शहराला चारही बाजूंनी पावसाने वेढले आहे. रिमझिम सरी नव्हे, तर काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांपर्यंत शहरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरूच राहणार आहे. शहरातील निचऱ्याच्या भागांमध्ये आधीच पाणी साचू लागले असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

राज्यात मॉन्सून सक्रिय; आज कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

पुणे : राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागला आहे. आज (ता. १६) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधारेची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा (रेड अलर्ट), कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार

कोल्हापूर : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले सोमवारी (ता. १६) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. मंत्री आठवले सकाळी १०.३० वाजता कोल्हापूर विमानतळावर येतील. तेथून ते ११ वाजता शासकीय विश्रामगृहामध्ये येतील. येथे ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर ११.३० वाजता ते कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ‘यशवंत बंगला’ येथे जाणार आहेत. तेथून दुपारी १२.३० वाजता कुरुंदवाड येथे गौतम ढाले यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. तेथून ते सांगलीकडे प्रयाण करतील.

Caste-wise Census : जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात

नवी दिल्ली : जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून (ता. १६) सुरुवात होणार आहे. उद्या जनगणनेची अधिसूचना प्रसिद्ध होईल. गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीत गृहसचिव, नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त यांच्यासह गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जनगणना प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला.

Sakav Bridge Collapsed : साकव कोसळून चौघांचा मृत्यू; आठ जण वाहून गेल्याचा अंदाज

Latest Marathi Live Updates 16 June 2025 : राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागला आहे. आज (ता. १६) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पाऊस वाढणार आहे. तसेच इंद्रायणी नदीवरील कुंडमळा (ता. मावळ) येथील सुमारे ३५ वर्षे जुना साकव (पूल) रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण वाहून गेले आहेत. तर, उत्तराखंडातील केदारनाथ येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. गौरीकुंड परिसरातील त्रियुगीनारायणजवळ हा अपघात घडला. जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आज जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.