Maharashtra Live News Update : घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा अंदाज
Saam TV June 19, 2025 03:45 AM
पन्नास रुपयांच्या उधारीवरून एकाची हत्या

पन्नास रुपयाची उधारी मागितली म्हणून लातूर मध्ये एकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.शहरातल्या म्हाडा कॉलनी येथे पान टपरी चालकाने उधारी मागितली यावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला आणि या वादातून टपरी चालक गणेश सूर्यवंशी वय 38 याची हत्या करण्यात आली आहे.तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत... दरम्यान या प्रकरणी आरोपी शहजाद शेख, आणि अब्बास शेख यांच्या विरोधात लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झालाय

परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव धरणातुन अवैध वाळु उपसा करणाऱ्या तीन बोटीवर महसुल पथकाची कारवाई

धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात अवैध वाळु उपसा करण्यासाठी दाखल झालेल्या तीन बोटीवर महसुल विभागाच्या पथकाने पोलिस बंदोबस्ता मध्ये कारवाई केलीय.सिना कोळेगाव धरण परीसरातील डोमगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली असुन अवैध वाळु उपसा करण्यासाठी दाखल झालेल्या तीन बोटींच्या वेगवेगळ्या भागात गॅस कटरने साह्याने छिद्र करण्यात आले तर एका बोटीला आग लावण्यात आली या कारवाईमुळे वाळु चोरांचे धाबे दणाणले आहेत.दरम्यान वाळु चोरी करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरीकांतुन केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणची स्वयंचलित हवामान केंद्र बंद तर काही नादुरुस्त

नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहेत. परंतु हे केंद्र कधी बंद तर कधी नादुरुस्त अवस्थेत आढळून येतात.त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज या केंद्रावर कधीच मिळताना दिसत नाही. नऊ जून रोजी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर,मुदखेड आणि भोकर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. परंतु अर्धापूर तालुक्यात असलेल्या चेनापूर येथील स्वयंचलित हवामान केंद्रावर ताशी केवळ 38 किमी इतक्या कमी वेगाच्या वाऱ्याची नोंद झाली. एवढ्या कमी वेगाच्या वाऱ्याची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळवण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. हे स्वयंचलित हवामान केंद्र अनेक ठिकाणी बंद आहेत तर अनेक ठिकाणी नादुरुस्त अवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज अनेक वेळा चुकताना दिसतोय.

शहरातील रस्ते दुरुस्त करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन, मनसेचा उल्हासनगर पालिका आयुक्तांना इशारा

उल्हासनगरात अनेक महिन्यांपासून सिमेंट काँक्रिटीकरनाच काम सुरू आहे यासाठी शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे रस्त्यावरील पावसात होणारा चिखल आणि खड्डे यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यात अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले असून आता रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका आयुक्तांना इशारा देण्यात आला आहे की लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावेत अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला आहे

येत्या 22 जून रोजी पंढरपुरात महा स्वच्छता अभियान

आषाढी यात्रेच्या निमित्ताने येत्या 22 जून रोजी पंढरपूर शहरामध्ये महा स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेला प्रारंभ होईल. स्वच्छता अभियानामध्ये जवळपास दीड हजार स्वयंसेवक आणि सर्व विभागातील शासकीय कर्मचारी सहभागी होणार आहेत. एकूण 22 स्वच्छता टीम तयार करून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ही स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

सिडको मुख्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सिडको मुख्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उरण तालुक्यातील धुतुम गावचे रहिवासी असलेले ८३ वर्षीय शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी सिडकोच्या अतिक्रमण विभागातील अधिकार्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

पीडित शेतकऱ्याच्या मुलीच्या मते, त्यांच्या वडिलांकडे चार एकर नऊ गुंठा जमीन असून, त्या जमिनीचा अद्याप सिडकोकडून मोबदला मिळालेला नाही. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते एक वाहनतळ चालवत होते. मात्र, सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने त्रास दिला जात होता.

स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही आदिवासींची परवड.झोळीतून रुग्णाचा खडतर प्रवास

कर्जतच्या दुर्गम भागातील दृश्य पाहिले की स्वातंत्र्याची 78 वर्षे पूर्ण होत असताना देश पारतंत्रात असल्याचे जाणवते.इंग्रजांची जुलमी राजवट आजही सरकार, प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्याच्यामागे सुरू आहे.विकासाच्या नावाखाली ढोल बडवणारे लोकप्रतिनिधींना मात्र कर्जत तालुक्यातील निखाऱ्यावरील खरे वास्तव्य लपवता येणार नाही.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलेला रस्ता अद्याप तयार होत नाही म्हणून आदिवासींच्या नशिबी डोलीयात्राच कायम आहे आणि म्हणूनच सरकारच्या बेफिकिरीमुळे अजून किती बळी घेणार म्हणून प्रश्न पुढे आला.

रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग

बोईसर एमआयडीसी रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग . हॉटेल ब्लू डायमंड जवळ उभ्या असलेल्या टँकर ने घेतला अचानक पेट . आगीचं कारण अस्पष्ट . अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल . तीन तासाच्या अथक प्रयत्न नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही . मात्र भर रस्त्यात आगीच रौद्ररूप .

वारी केल्याने एक नवीन स्फूर्ती येते.... पुरुषोत्तम महाराज मोरे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची वारी सर्वधर्मसमभाव आणि एकात्मतेचे प्रतीक म्हणजेच आषाढी वारी. वारीला कुणालाही निमंत्रण नसते तरीही वारीत मोठ्या संख्येने भाविक सामील होतात. संत तुकाराम महाराज यांचे तिसरे पुत्र नारायण महाराज यांनी देहू ते पंढरपू या आषाढी वारीला सुरुवात केली आहे. पादुका म्हणजे काय दोन चरणांना फार महत्त्व आहे. सर्वात पहिले आईचे चरण आणि दुसरे म्हणजे संतांचे म्हणजेच पांडुरंगाचे चरण होय म्हणजे पादुका. इतिहासात पादुकांची फार महत्व सांगितले गेले आहेत. वामन अवतारातही पादुकांना फार महत्त्व दिले आहे. वारीमध्ये सगळ्यात पुढे सर्व धर्मांच्या दिंड्या असतात त्यांना आज्या मेळ्याच्या दिंड्या म्हणतात.. या दिंडी सोहळ्यामध्ये पायी चालणारा ही आनंदीत असतो. जेवणाराही आनंदीत आहे आणि दान करणाराही आनंदित असतो. आमच्यावर फार मोठे संस्कार आहे. माझी आई मिरची भाकरीची आणि मिरचीचा ठेचा शिदोरी देऊन तुझ्या सोबत आणखी भाविकांना जेवण दे असं सांगायची. मोबाईलची बॅटरी ज्या पद्धतीने चार्जिंग होते, त्या पद्धतीने वारीला गेल्यानंतर भावीकही चार्जिंग होतो. अध्यात्मिक ऊर्जा मिळण्यासाठी वारीत जायला पाहिजे. स्वर्गीय आनंद असतो या वारीला गेल्यावर मिळतो. वारीमध्ये देव ऋषीमुनीही सामील होत असतात. चला पंढरीसी जाऊ रखमदेवी वर पाहू. इतर ठिकाणच्या पांडुरंगाला आपण भेटायला जातो पण इथल्या पांडुरंग जन्मोजन्मीची आपली वाट बघत असतो. वारीचे महत्त्व म्हणजे काय तर वारीमध्ये म्हातारी माणसंही तरणी होतात. नाचायला लागतात बाळगायला लागतात. सुख म्हणजे काय ते फक्त वारीमध्येच आपल्याला अनुभवला मिळते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.