घर म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच.. असे आपण नेहमीच ऐकतो. कुटूंबात छोट्या-मोठ्या कुरबुरी होणं स्वाभाविकच आहे. कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असल्याने भांडणं होणं ही गोष्ट सामान्य आहे. पण, वारंवार घरात कलह होणे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही. काही वेळा या छोट्यामोठ्या कुरबुरीचे रूपांतर मोठ्या भांडणात होते आणि घरातील वातावरण अचानक तणावपूर्ण होते. या वातावरणाचा कुटूंबाच्या प्रत्येक सदस्यावर परिणाम होण्यास सुरूवात होते. आर्थिक अडचणींना आमंत्रण मिळते. तुम्हीही घरातील छोट्या-मोठ्या कुरूबुरीने त्रस्त असाल तर वास्तुशास्त्रातील काही उपाय नक्कीच करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात घरात होणारे कलह थांबवण्यासाठी सोपे उपाय.
हनुमानाची पूजा –
घरातील कटकटी थांबवण्यासाठी मंगळवारी हनुमानाची पूजा करून पंचमुखी दिवा लावावा. यामुळे कुटूंबाला सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते.
सत्यनारायण काठा –
घरात सुख-शांती नांदण्यासाठी सत्यनारायण कथा करावी. या पूजेतील कथा ऐकल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो, ज्यामुळे घरात कटकटी होत नाहीत.
अंथरूणावर बसून खाऊ नका –
बेडवर बसून जेवल्याने घरात आर्थिक समस्या सुरू होतात. त्यामुळे तुम्हाला अशी काही सवय असेल तर आजच सोडा.
मिठाच्या पाण्याने फरशी पुसा –
जर घरात वारंवार भांडणे होत असतील तर काही दिवस मिठाच्या पाण्याने फरशी पुसा. मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, ज्यामुळे वादविवाद होत नाहीत.
हेही पाहा –