ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा पंजा, इंग्लंडला आघाडी घेण्यापासून रोखलं, टीम इंडियाला 6 रन्सची लीड
GH News June 22, 2025 11:05 PM

टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी (22 जून) आघाडी मोडीत काढण्यापासून रोखलं आहे. ओपनर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या तिघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात 100.4 ओव्हरमध्ये 465 रन्स केल्या. इंग्लंडसाठी उपकर्णधार ओली पोप याने सर्वाधिक 106 धावांची खेळी केली. तर इतरांनी चांगलं योगदान दिलं. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.