महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्यावर राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे बोलले आहेत. “आपल्या हिंदू राष्ट्राला तोडण्याचे फार मोठे षडयंत्र आहे. इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे मनसुबे आखले जातं आहेत त्याला आपण खत पाणी टाकतोय? आमच्या सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही. मराठी सक्ती निश्चित आहे. हिंदी नको असेल, तर संस्कृत घ्या पण हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत असतील, तर इस्लामिक राष्ट्र बनविण्याच्या प्रयत्नाला तुम्ही हातभर लावताय का? याचा विचार करुन आंदोलन करावं. हिंदुंमध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मदत” असं नितेश राणे म्हणाले.
“दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात, त्यावर आजमी सारखे कारटे काहीच बोलताना दिसत नाही. आमच्या महाकुंभवर, आमची वारी सुरु झाली तर त्यावर आक्षेप घ्यायचा. आमची वारी वर्ष भर असत नाही पण तुमच्या रोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला. त्यावर अबू आजमीने आपलं थोबाड उघडावं. हे आम्ही इथे खपवून घेणार नाही. आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का?. वारीवर बोलण्याची हिंम्मत कोणी करू नये. आमची वारी अशीच सुरु राहणार” असं नितेश राणे यांनी सांगितलं.
‘राऊतने स्वतःला आरशात पहाव’
“मालेगाव माजी आमदार असो किंवा औरंग्याच्या पिलावळीतील राहिलेल्यांना औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचा कार्यक्रम करावा लागेल” अशी आक्रमक भाषा नितेश राणे यांनी केली. “गद्दार कोण ह्यावर पुस्तक लिहिण्याची गरज आहे. सर्वात मोठा गद्दार म्हणजे संजय राऊत उबाठा ( शिवसेना) आणि उद्धव ठाकरेंची जी अवस्था झालीय, त्याला राऊत जबाबदार आहे. राऊतने स्वतःला आरशात पहाव आणि मग आरोप करावे” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “गुलाबराव पाटील जे बोलले ते योग्य बोलले, राजसाहेब जेव्हा बाहेर पडले तेव्हा याची गाडी कार्यकर्त्यांनी फोडली. राऊत हाच शकुनी मामा आहे” असं नितेश राणे बोलले. “मंत्री म्हणून राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. जी ऊर्जा मिळते त्यामुळे मी हिंदू राष्ट्रासाठी काम करू शकतो” असं नितेश राणे म्हणाले.