ALSO READ: महाराष्ट्रासह 26 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा,कोकण-ठाण्यात यलो अलर्ट
विदर्भात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी, फारसा पाऊस पडत नाही. परिणामी, या भागातील शेतकरी पेरणीसाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत. काही भागात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत चालले आहे.
ALSO READ: मुंबई-पुण्यात पावसाचा कहर, देशात अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे राज्याच्या पश्चिम भागात ढगांची घनता वाढली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि हवामान परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: देवेंद्र फडणवीसांच्या बोल बच्चन वक्तव्यावर संजय राऊतांचा घणाघात