नाशिक येथील कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने आतापर्यंत दोन ते तीनवेळा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. मात्र, एकाही बैठकीला बोलवले नाही. लोकप्रतिनिधी म्हणून बोलण्याची संधी द्या, अशा शब्दांत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Maharashtra Politics : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतोकिरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याच्या बैठकीत अजित पवार यांनी या सूचना केल्या. सोमय्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असंही त्यांनी म्हंटलं. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.किरीट सोमय्यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात मोहीम उघडलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असं स्पष्ट शब्दात अजित पवारांनी सांगितलं आहे.