अकोला : कुठल्या कारणावरुन वादाला तोंड फुटेल आणि काय आक्रीत घडेल याचा नेम नसतो. अकोल्यातही अशीच एक चित्र-विचित्र घटना घडली आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी निघालेल्या रुग्णावाहिकेकडून कुत्र्याचा जीव गेला अन् सगळा गोंधळ उडाला. जखमी कामगार मजुराला ॲम्बुलन्सने अकोल्यात (Akola) घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेच्या चालकास मारहाण करण्यात आल्याने विलंब होऊन रुग्णवाहिकेतील जखमी रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा फाट्यावर ही गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली असून या घटनेनंतर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून (Police) शोध घेतला जात आहे. मात्र, या कुत्रामालकामुळेच रुग्णवाहिकेतील रुग्णाचा मृत्यू झाल्याच आरोपी नातेवाईकांनी करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दहीहंडा फाट्यावरुन अकोल्याकडे निघालेल्या ॲम्बुलन्सने चोहोट्टा बाजार येथे एक कुत्रा मरण पावला. त्यामुळे, जखमी कुत्र्याच्या मालकाने ॲम्बुलन्स चालकाचा पाठलाग करत त्याला मारहाण केली. ॲम्बुलन्सचा पाठलाग करून दहीहंडा फाट्यावर ॲम्बुलन्स चालकाला पकडत कुत्रा मालाकाने जबर मारहाण केली. त्यामुळे, बराच वेळ रुग्णावाहिका घटनास्थळी थांबून राहिली, याशिवाय रुग्णवाहिकेतील जखमी रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला, या दोन्हीमध्ये ॲम्बुलन्स चालकाचा मोठा वेळ गेला आणि रुग्णवाहिकेतील रुग्णाचा जीव केला. जखमी कुत्र्याच्या मालकानेच ॲम्बुलन्स चालकाला ॲम्बुलन्स अकोल्याकडे घेऊन जाण्यासाठी अटकाव केला होता. ॲम्बुलन्स चालकाला मारहाण केलेल्या व्यक्तीमुळे रुग्णाचे प्राण गेल्याचा ॲम्बुलन्सचालक आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. तसेच, कुत्र्याच्या मालकावर कठोर कारवाईची मागणी देखील नातेवाईक आणि ॲम्बुलन्स चालकाने केली आहे. दरम्यान, सदर घटनेनंतर ॲम्बुलन्सला अटकाव करणारा व्यक्ती जागेवरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
बीडच्या माजलगाव शहरातील बायपास रोडलगत असलेल्या छत्रपती नगर भागात रात्रीच्या वेळेला चोरांचा मुक्त वावर असल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या वेळेला चार ते पाच जणांचे टोळके गेल्या काही दिवसापासून छत्रपती नगर भागात फिरत असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यामुळे छत्रपती नगर भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार होण्याआधी या भागात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आलीय.
95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत; धाराशिव जिल्ह्यात खळबळ
आणखी वाचा