भारतीय महिला क्रिकेट संघाने २८ जून रोजी इंग्लंडविरुद्ध नॉटिंगघमला झालेल्या टी२० सामन्यात ९७ धावांनी विजय मिळवला.
या विजयात स्मृती मानधनाने शतक ठोकत इतिहास घडवला. तिने ६२ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली.
त्यामुळे स्मृती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू, तर एकूण भारताची (महिला आणि पुरुष मिळून) सहावी खेळाडू ठरली आहे.
स्मृतीच्या आधी ५ भारतीय पुरुष खेळाडूंनी तिन्ही क्रिकेट प्रकारात शतके करण्याचा पराक्रम केला आहे. कोण आहेत हे खेळाडू पाहा. (आकडेवारी २८ जून २०२५ पर्यंत)
सुरेश रैना भारताचा पहिला खेळाडू आहे, ज्याने तिन्ही प्रकारात शतक केले. त्याने कसोटीत १, वनडेत ५ आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १ शतक केले आहे.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० कसोटी शतके, ५१ वनडे शतके, १ टी२० शतक केले आहे. त्याने एकूण ८२ शतके केली आहेत.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ कसोटी शतके, ३२ वनडे शतके, ५ टी२० शतके केले आहेत.
केएल राहुलने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीत ९, वनडेत ७ आणि टी२० मध्ये २ शतके केली आहेत.
शुभमन गिलने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीत ६ शतके, वनडेत ८ शतके आणि टी२०मध्ये १ शतक ठोकले आहे.