योगेश काशीद
बीड : बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून या मुसळधार पावसांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेअक्षरशः कंबरडे मोडले आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गाव परिसरातील शेतामध्ये आजही गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे पूर्ण पीक जळून गेले असून यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती हजारो शेतकऱ्यांची आहे.
राज्यभरात मुसळधार पावसाचा जोर आजही कायम आहे. दरम्यान बीडजिल्ह्यात जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करताना शेतकरी पुरता खचून गेला आहे. दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या स्वप्नाची माती केली आहे. खरीप पिकातील नगदी पीक सोयाबीन व कापूस पाणी लागल्याने जळून गेला आहे. त्यामुळे केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरीरडकुंडीला आला आहे.
Beed Rain : बीडच्या ११ तालुक्यात अतिवृष्टी; पिकांचे अतोनात नुकसान, सोयाबीनसह कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भावसोयाबीनसह कापसाचे नुकसान
सोयाबीन बरोबरच कापूस उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडला आहे. केलेला खर्चही निघणार नसल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने आधार देणे गरजेचे आहे. गावातील खंडू कदम या शेतकऱ्याने आठ एकर वर कपाशी लागवड केली पण आठ दिवसापासून लागू राहिलेल्या पावसामुळे पाच एकर कपाशी पाण्याने पूर्ण केली आहे त्यामुळे आता काय करायचं असं सवाल या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. माजलगावतालुक्यातील अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे. गोदावरी, सिंदफना आणि सरस्वती नदीच्या पुरामुळे शेकडो एकर वरील शेती पाण्याखाली गेली. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ धीर देऊन त्यांच्या अश्रू असावेत अशी मागणी होत आहे.
Nanded Flood : सहा दिवसापासून गावांचा संपर्क तुटलेला; वैद्यकीय पथक बोटीद्वारे गावात दाखल, गरोदर महिलेचे रेस्क्यूसरकारला आर्त हाक
कोथरूड गावातील महिला शेतकरी कांताबाई कदम यांची हाक सरकार ऐकणार आहे का? शेतातलं सगळं वाहून गेलं मुख्यमंत्री साहेब; मुलांचे शिक्षण कशी करायची? असा सवाल बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथरूड गावचा महिला शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कांताबाई कदम शेतकरी महिला माधुरी कदम या महिलेची पाच एकर शेती आहे यात पन्नास हजार रुपये खर्च करून सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली. पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन उगवून आला नाही. परत पेरणी करावी लागली. दुसऱ्यांदा पेरणीसाठी गोल्ड लोन काढलं. आता अतिवृष्टीने सर्वच पीक खराब झाले आहे. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महिला शेतकरी करत आहेत.