विरार इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा शोध लागला असून त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इतर गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळला होता. या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक कुटुंब गाडली गेली. या कुटुंबांचे शोधकार्य एनडीआरफ पथक आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाकडून सुरू आहे.