नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परखड आणि थेट बोलण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नागपुरात आयोजित महानुभव पंथीय सम्मेलनात बोलताना त्यांनी पंथ आणि संप्रदायांपासून मंत्र्यांना दूर ठेवण्याचा सल्ला दिला. "पंथ आणि संप्रदायांनी मंत्र्यांना आपल्या कामापासून लांब ठेवले पाहिजे. जिथे मंत्री घुसतात, तिथे आग लावल्याशिवाय राहत नाहीत," असे त्यांनी ठणकावून सांगितले. धर्मकारण, समाजकारण आणि राजकारण या तीन वेगवेगळ्या गोष्टी असून, त्यांना एकत्र मिसळणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.
राजकारण आणि समाजकारण वेगळे ठेवागडकरी यांनी राजकारण आणि समाजकारण यांच्यातील सीमारेषा स्पष्ट करताना सांगितले की, कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी मंत्र्यांचा उपयोग आपले काम करून घेण्यासाठी करावा, परंतु त्यांना पंथ किंवा संप्रदायात हस्तक्षेप करू देऊ नये. "मंत्र्याच्या गळ्यात हार घालून तुमचे काम करून घ्या, पण तुमच्या धर्मकारणात आणि समाजकारणात त्यांना घुसू देऊ नका," असा सल्ला त्यांनी दिला. राजकारण हे विकासकारणाशी जोडलेले असले तरी ते धर्म आणि समाजापासून वेगळे ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे.
Nitin Gadkari : अखंड भारत नक्की होणार, फाळणी अनैसर्गिक होती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आम्ही आग लावतो, मग भांडणे वाढतातगडकरी यांनी आपल्या मिश्किल शैलीत राजकीय हस्तक्षेपाचे परिणाम उलगडले. "आम्ही राजकारणी जिथे घुसतो, तिथे आग लावतो. मग महंत आपसात भांडायला लागतात, गादीसाठी वाद होतात. आम्ही स्थगिती देतो, समिती नेमतो आणि मग दोन्ही महंत आमच्याकडे चकरा मारतात," असे ते हसतहसत म्हणाले. या टिप्पणीने उपस्थितांमध्ये हशा पिकला, पण त्यांच्या बोलण्यातून राजकीय हस्तक्षेपाचे गंभीर परिणामही अधोरेखित झाले.
"खरे बोलण्यास मनाई आहे"गडकरी यांनी राजकीय क्षेत्रातील वास्तवावरही भाष्य केले. "मी ज्या क्षेत्रात काम करतो, तिथे मनापासून खरे बोलण्यास मनाई आहे. जो लोकांना सर्वात जास्त मूर्ख बनवू शकतो, तोच सर्वात चांगला नेता बनतो," असे त्यांनी थेटपणे सांगितले. मात्र, त्यांनी श्रीकृष्णांचा दाखला देत सांगितले की, अंतिम विजय हा सत्याचाच होतो. त्यांच्या या विधानाने उपस्थितांवर खोलवर परिणाम झाला.
समाजकारणाचा विजयगडकरींच्या या परखड मतांनी समाजात राजकारण आणि धर्म यांच्यातील सीमारेषा स्पष्ट करण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यांनी पंथ आणि संप्रदायांना स्वायत्त राहण्याचा सल्ला देताना समाजकारण आणि विकासकारण यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. "सत्याचा विजय होतो, आणि तोच अंतिम सत्य आहे," असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
Nitin Gadkari: पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी रस्ते विकासाची गरज, नितीन गडकरी यांची भेट घेत नीलेश लंकेंची मागणी