बीसीसीआय निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटकडून टीम इंडियात काही बदल केले आहेत. तसेच येत्या काळात बदल केले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार संघ व्यवस्थापन दुसऱ्या विकेटकीपरच्या शोधात असल्याचं म्हटलं जात आहे. ऋषभ पंत, इशान किशन आणि ध्रुव जुरेल या तिघांच्या नावाची चर्चा आहे. पंत-इशानसमोर ध्रुव काही प्रमाणात पिछाडीवर आहे. ऋषभ आणि इशान या दोघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या निमित्ताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेटकीपर ऋषभ आणि इशान या दोघांपैकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सरस कोण आहे? हे जाणून घेऊयात.