BMC Election 2026: महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकांचा निकाल समोर आहे. ज्यामध्ये मुंबई सर्वात मोठा पक्ष ठरला आहे… राज्याप्रमाणेच मुंबईत देखील भाजप पक्षाचे उमेदवार निवडून आले आहे. आता महानगरपालिकेत देखील भाजपची सत्ता स्थापन होईल… अशी देखील चर्चा सुरु आहे. एवढंच नाही तर, मुंबईच्या महापौर पदावर कोण बसेल याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. बीएमसीमध्ये महापौर पदाला मोठं महत्त्व आह आणि या पदासाठी स्पर्धा देखील फार मोठी असते. पण महापौरांव्यतिरिक्त, बीएमसीमध्ये आणखी एक पद आहे ज्याकडे सर्वात जास्त अधिकार आहेत. महापौर कसे निवडले जातात आणि सर्व प्रमुख निर्णयांमध्ये कोणाचा सहभाग असतो ते जाणून घ्या…
नगरसेवकांचं वेतन किती असतं?सांगायचं झालं तर,मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना वेतन मिळत नाही. नगरसेवकांना प्रत्येक महिन्याला एक निश्चित मानधन दिलं जातं. जुलै 2017 मध्ये बीएमसीने नगरसेवकांच्या मानधनात वाढ केली. पूर्वी नगरसेवकांना दरमहा 10 हजार रुपये मिळत होते, जे 2017 मध्ये वाढवून 25 हजार रुपये करण्यात आले. 2010 पासून वाढत्या महागाईमुळे हा निर्णय घेण्यात आला.
कशी होते महापौर पदाची निवड?बीएमसीमध्ये एकून 227 नगरसेवक असतात. ज्यांना कॉरपोरेटर देखील म्हटलं जातं… ज्या पक्षाला बहुमत मिळतं, त्याच पक्षाचा महापौर होतो. महानगरपालिकेत निवडून आलेलेच नगरसेवक महापौराची निवड करतात. महापौरांचा कार्यकाळ हा 2.5 वर्षांचा असतो. तर नगरसेवकांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. एका महापौराचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्या महापौराची निवड केली जाते.
बीएमसीमध्ये कोणत्या पदाकडे असते सर्वात जास्त पॉवर?BMC मध्ये सर्वात मोठं पद महापौराचं असतं. पण सर्वात जास्त पॉवर दुसऱ्याच पदाकडे असते. सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत दोन विंग असतात… पहिला राजकीय विभाग आणि दुसरा प्रशासकीय विभाग… राजकीय विभागाचे प्रमुख महापौर असतात. तर प्रशासकीय विभागाचे प्रमुख महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) असतात.
का महत्त्वाची आहे मुंबई महानगरपालिका?मुंबई महानगरपालिका फक्त देशातीलच नाही तर, आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिकेचं बजट तब्बल 75000 कोटी रुपये आहे… कोट्यवधी रुपयांच्या निविदा आणि कामांची हाताळणी करणारी ही महानगरपालिका जिंकणं हे प्रत्येक पक्षाचे स्वप्न असते. आर्थिक राजधानीतील प्रत्येक लहान-मोठी कामे हाताळणाऱ्या या महानगरपालिकेत कोणताही पक्ष सत्तेत असला तरी, मुंबईवर त्यांचा प्रभाव राहतो… जवळपास 25 वर्ष शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर राज्य केलं. पण आता महापौर म्हणून कोणाची घोषणा होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.