महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. मुंबईहून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी उड्डाण केलेले विमान 8 वाजून 42 मिनिटांनी बारामती विमानतळाजवळ, लँडिंगच्या 100 मीटर अंतरावर कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, पिंकी माळी आणि क्रू मेंबर कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन संभावी पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अजित पवार हे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी बारामतीला जात होते. या अपघातामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला असून, राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री यांनी अजित पवार यांना संघर्षशील नेतृत्व असे संबोधले आहे. बारामती येथील रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत शोक व्यक्त केला.